• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित, समृध्द आणि सुरक्षित भारत निर्माण झाला

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
June 12, 2025
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पत्रकार परिषदेत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांची माहिती

लातूर/प्रतिनिधी : २०१४ साली लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपाला बहुमत दिले होते. देशातील जनतेने दिलेल्या बहुमताचा आदर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याची ग्वाही देवून आपला कारभार सुरू केला होता. मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळास ११ वर्ष पूर्ण होत असून यादरम्यान केवळ भ्रष्टाचारमुक्तच नव्हे तर विकसित, समृध्द आणि सुरक्षित भारत निर्माण झाला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

लातूर येथील शासकीय विश्रागृहात आयोजित मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संकल्प से सिध्दी या विषयासंबंधी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्यासह भाजपा पदाधिकाºयांची उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला ११ वर्षाचा प्रवास १४० कोटी भारतीयांना सोबत घेवून पूर्ण केला असल्याचे सांगत आ. निलंगेकर म्हणाले की, या११ वर्षाच्या कामगिरीची माहिती एका भाषणात किंवा पत्रकार परिषदेत देणे शक्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी उज्ज्वल भारताच्या भविष्याची पायाभरणी केलेली असून विकासाला गती दिलेली असून सबका साथ सबका विश्वास सबका विश्वास या संकल्पनेनुसार त्यांनी देशाचा कारभार केलेला आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी उद्योग विकासालाही मोठी चालना दिली आहे. जनतेने आपल्याला जो जनाधार दिलेला आहे.तो जनाधार सार्थ ठरविण्यासाठी त्यांनी कायमच जनतेच्या हिताला आणि देशाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान मोदी सरकारच्या आधी भारताला भ्रष्टाचाराने पोखरून काढले होते. जनतेसाठी विविध योजना राबविल्या जात असल्या तरी याचा लाभ सामन्य जनतेपर्यंत पोहोचत नसे. त्याच बरोबर सर्वसामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचाराच्या सुविधा उपलब्ध असुनही त्या परवडणाºया नव्हत्या. सर्वसामान्य जनतेचे आयुष्य सुखकर व्हावे याकरिता पंतप्रधान मोदी यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ देण्यासह आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले.
मेक इन इंडियाच्या माध्यमातून उद्योगाला चालना देवून अनेक वस्तुंची निर्यात करणारा देश म्हणून अवघ्या जगात भारताची ओळख निर्माण केली आहे. देशाची अर्थव्यवस्था बळकट करून आज जगातील चौथी अर्थव्यवस्था म्हणून भारताने आपली वाटचाली सक्षमपणे सुरू ठेवली आहे. विशेष म्हणजे या सर्वांचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनी स्वत: न घेता देशातील १४० कोटी जनतेला दिले आहे. दहशतवाचा बिनमोड करताना त्यांच्या देशात घुसून जशाच तशे उत्तर देण्याचे कामही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने करून जगातील बलशाली देश म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे भारतातच विविध शस्त्रे व क्षेपणास्त्रे निर्माण करून संरक्षण क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत आहेत. गरीबीचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या या ११ वर्षाच्या कार्यकाळात गरीब कल्याण अन्न योजना, उज्वला योजना, आवास योजना, जलजीवन मिशन, जनधन योजना, आयुष्यमान भारत, किसान सन्मान योजना अशा अनेक योजना राबवून त्याचा लाभ सर्वसमान्य नागरिकांना देण्यात येत आहे. केवळ भारताला समृध्द करण्याचेच नव्हे तर भारताची संस्कृती जोपासण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. श्री राम मंदीर निर्मीती, काशी विश्वनाथ कॉरिडॉर यासारखी अनेक उदाहरणे देता येतील. जम्मू-काश्मिरमध्ये असलेले ३७० कलम रद्द करून देशाची अखंडता अबाधित ठेवण्याचे काम पंतप्रधान मोदीेंनी केले आहे. या ११ वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी यांनी देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी जनतेला विश्वासात घेवून सामुहीक प्रयत्न करून सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पना कृतीत आणून एक आदर्श स्थापित केला असल्याचे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी मंत्री बस्वराज पाटील मुरुमकर तर आभार प्रदर्शन शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले. यावेळी ग्रामीण जिल्हा महामंत्री संजय दोरवे, प्रदेश सांस्कृतिक सेलचे अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, प्रवक्ता प्रेरणा होनराव, माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, सुधीर धुत्तेकर, सरचिटणीस रवी सुडे, मीना भोसले, व्यंकटेश कुलकर्णी यांच्यासह ग्रामीण व शहराचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

**🛑 लातूर महापालिकेचा पावसाळ्यातील ‘आजब कारभार’! 🛑भर पावसात रस्ते फोडून लातूरकरांच्या सहनशक्तीचा घेतोय कस?नगरविकासाच्या नियमांना पायदळी तुडवत ‘गुत्तेदारराज’ सुरूच!

Next Post

आमचे मित्र अझर शेख वलांडी यांची ऐकवेळ ऐकावी अशी शेरी शायरी….https://youtu.be/g2YZEfga8aU?si=kG3toVstIkHDKgiO

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

आमचे मित्र अझर शेख वलांडी यांची ऐकवेळ ऐकावी अशी शेरी शायरी….https://youtu.be/g2YZEfga8aU?si=kG3toVstIkHDKgiO

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved