• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

राज्यपालांच्या हस्ते ‘अटल संस्मरण’ ग्रंथाचे प्रकाशन; अटलजींचे जीवन नेतृत्व, शालीनता आणि मूल्यांचा आदर्श – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
July 1, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, प्रतिनिधी :
देशाचे माजी पंतप्रधान यांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील आठवणींचा वेध घेणाऱ्या ‘अटल संस्मरण’ या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते मंगळवारी महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे संपन्न झाले. वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या या ग्रंथाचे लेखन त्यांचे माजी माध्यम सल्लागार यांनी केले आहे.

यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करताना सांगितले की, “अटलजींच्या विचारांनी आणि कार्याने प्रेरित होऊन आपण सार्वजनिक जीवनात आलो. भावी पिढ्यांना नेतृत्वगुण, राजकारणातील शालीनता आणि नीतिमत्ता शिकायची असेल तर त्यांनी अटलजींचे सार्वजनिक जीवन अभ्यासले पाहिजे.”

अटलजी हे नेता कसा असावा आणि विरोधी पक्षनेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण होते, असे सांगून राज्यपालांनी त्यांच्या वक्तृत्वकौशल्याचा आणि विचारशील नेतृत्वाचा उल्लेख केला. उत्तरपूर्व भारतात पक्षकार्य करताना अटलजींनी कार्यकर्त्यांना नेहमी प्रेरणा दिली. विरोधी पक्षात असताना जसे ते होते तसेच पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांच्या स्वभावातील साधेपणा आणि मूल्यनिष्ठा कायम राहिली, असे त्यांनी नमूद केले.

राज्यपालांनी अटलजींच्या भारतीयतेच्या विचाराचा संदर्भ देत सांगितले की, विविधतेतील एकता हीच भारताची खरी ओळख आहे. नैतिकतेचा ऱ्हास होत असलेल्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा अणुऊर्जा यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करताना मूल्ये आणि नीतिमत्ता आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अटलजींनी राजकारणात कधीही शॉर्टकट स्वीकारला नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘अटल संस्मरण’ प्रेरणादायी दस्तावेज – आशिष शेलार

कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री यांनी ‘अटल संस्मरण’ हा उच्च साहित्यिक मूल्य असलेला आणि अटलजींच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण दस्तावेज असल्याचे सांगितले.

अटलजींचे जीवन संघर्षमय होते, मात्र त्यांच्या विचारांमध्ये आणि आचारांमध्ये कधीही कटुता नव्हती. ते उत्तम वक्ते, सुसंस्कृत राजकारणी आणि लोकशाही मूल्यांचे समर्थक होते. संवाद आणि सहमतीच्या राजकारणाची शिकवण त्यांनी देशाला दिली, असे शेलार यांनी नमूद केले.

अटलजींनी देशाला अणुऊर्जा संपन्न केले तेव्हा अनेक आव्हाने आली, मात्र त्यांनी देशहिताच्या निर्णयांपासून माघार घेतली नाही, असेही त्यांनी सांगितले. कवी मनाचा हळवा स्वभाव आणि प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची क्षमता हे अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी लेखक अशोक टंडन यांनी अटलजींसोबतच्या सहा वर्षांच्या सहवासातील आठवणी सांगितल्या. पंतप्रधानपदावरील त्यांचा कार्यकाळ, १३ दिवसांच्या सरकारच्या काळातील घडामोडी आणि विविध राजकीय अनुभव या पुस्तकातून मांडले असल्याचे त्यांनी सांगितले. हे पुस्तक अटलजींना वाहिलेली श्रद्धांजली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकाशन सोहळ्यास प्रसिद्ध गायक , रवींद्र संघवी, बिनॉय बी. यांच्यासह साहित्य, कला, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचार, नेतृत्व आणि मूल्यनिष्ठ राजकारणाची आठवण करून देणारा ‘अटल संस्मरण’ ग्रंथ भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Previous Post

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026

श्रेयवादाच्या राजकारणात अडकले लातूरचे नाट्यगृह; नाट्यकर्मींचा संयम आता संपत चालला! पालकमंत्री यात लक्ष घालतील का…!

June 26, 2026

🌧️ पावसाची प्रतीक्षा संपली; मुंबईत मान्सून दाखल, महाराष्ट्रासाठी शुभ संकेत

June 23, 2026

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026

Recent News

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार जाहीर

June 29, 2026

श्रेयवादाच्या राजकारणात अडकले लातूरचे नाट्यगृह; नाट्यकर्मींचा संयम आता संपत चालला! पालकमंत्री यात लक्ष घालतील का…!

June 26, 2026

🌧️ पावसाची प्रतीक्षा संपली; मुंबईत मान्सून दाखल, महाराष्ट्रासाठी शुभ संकेत

June 23, 2026

धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रूजू

June 19, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

श्रेयवादाच्या राजकारणात अडकले लातूरचे नाट्यगृह; नाट्यकर्मींचा संयम आता संपत चालला! पालकमंत्री यात लक्ष घालतील का…!

June 26, 2026

🌧️ पावसाची प्रतीक्षा संपली; मुंबईत मान्सून दाखल, महाराष्ट्रासाठी शुभ संकेत

June 23, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved