• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी सहभाग घ्यावा – अमर हबीब यांचे आवाहन

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 3, 2025
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–

या वर्षीही शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहडत म्हणून किसानपुत्र आंदोलनच्या वतीने १९ मार्च रोजी करण्यात येणाऱ्या अन्नत्याग आंदोलनात किसानपुत्रांनी अधिकाधिक सहभागी व्हावे, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले.

 किसानपुत्र आंदोलनच्या वतीने अंबाजोगाई येथे १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलना निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत अमर हबीब बोलत होते.

अमर हबीब पुढे म्हणाले की, देशातील ९० टक्के लोक शेतीवर अवलंबून असतांनापासुन शेतकरी आत्महत्या सुरु आहेत. तेंव्हापासून आजपर्यंत आर्थिक विवंचनेतून शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहेत. आज शेतीवर अवलंबून असलेल्या शेतक-यांचे प्रमाण ९० टक्क्यांवरुन दहा ते पंधरा टक्क्यांवर आले आहे, मात्र शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण काही कमी झाले नाही, हे भीषण वास्तव चित्र आहे.

किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी मागील नऊ वर्षांपासून किसानपुत्र आंदोलन १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन राबवित आहे. अंबाजोगाई येथे हा उपक्रम गेली आठ वर्षांपासून अतिशय चांगल्या पद्धतीने सुरु असून यावर्षी स्थानिक संयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांत किसानपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमर हबीब यांनी केले.

विविध उपक्रम

  बैठकीच्या प्रारंभी संयोजक सुदर्शन रापतवार यांनी १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये १९ मार्च रोजी सकाळी सामुहिक उपवास,   सहवेदना रॅली, शेतकरी सहवेदना पुरस्कार, आत्महत्याग्रस्त शेतकरी बहिणींचा साडीचोळी देऊन सन्मान, शेतकरी आत्महत्या कारणे आणि मिमांसा या विषयावरील व्याख्यान आणि सामुहिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम यांच्या संपुर्ण नियोजनाची माहिती दिली.

या कार्यक्रमात अंबाजोगाई तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील बहिणींचा सहभाग जास्तीत जास्त कसा करुन घेता येईल यासाठी ऍड. संतोष पवार यांनी माहिती दिली तर आत्महत्याग्रस्त शेतकरी बहिणीच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन संबंधीची माहिती शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट यांनी दिली.

या बैठकीत अच्चुत बापु गंगणे, वसंतराव मोरे, अनिता कांबळे, अनिरुद्ध चौसाळकर, प्रा. शांती नाथ बनसोडे, मदन परदेशी, महावीर भगरे यांनी उपयुक्त सूचना केल्या.

नगर परिषद परीसरातील पत्रकार कक्ष येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस अमर हबीब, कालिदास आपेट, प्रा. शांतिनाथ बनसोडे, मुजीब काजी, अनिरुद्ध चौसाळकर, अच्चूत गंगणे, मदन परदेशी, संतोष बोबडे महावीर भगरे, व्यंकटेश जोशी, वसंत मोरे, इस्माईल शेख, लखन होके, कल्याणराव भगत, रेखा देशमुख, किरण देशमुख, अनिता कांबळे, प्रतिभा अवचर, दत्तात्रय अंबेकर, ऍड. माणिकराव बावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

ख्वाइश ये ना रखे कि,”तारीफ” हर कोई करे…कोशिश यही करे कि,बस कोई बुरा ना कहे…

Next Post

समर्पित सेवा आणि आनंदी सहजीवन – डॉक्टर बी. आर. पाटील सरांना सलाम!

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

समर्पित सेवा आणि आनंदी सहजीवन – डॉक्टर बी. आर. पाटील सरांना सलाम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved