Latest Post

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

गांडुळ खत निर्मिती करुन आम्ही आमच्या शेतातील मातीची गुणवत्ता नक्की वाढणार व सत्वयुक्त व शुध्द अन्नधान्याची आम्ही निर्मिती करणार आहाेत....

Read more

राजगडावरून मार्गासणी पर्यंत पाण्याची दगडी पाईपलाईन : दूरदृष्टीचा अद्भुत वारसाचा नमुना आणि अमृत ची पाईपलाईन होऊनही लातूरकरांना अजून पाणी मिळेना…

पुणे जिल्ह्यातील राजगड हा फक्त पराक्रमाचा, स्वराज्याच्या इतिहासाचा आणि शौर्याचा साक्षीदार गड नाही; तर तो व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि लोककल्याणाच्या दूरदृष्टीचा...

Read more

मौजे खरोळा येथे पार पडला स्तुत्य उपक्रम

खरोळा (ता. रेणापूर) : दयानंद शिक्षण संस्था संचलित, दयानंद विधी महाविद्यालय, लातूर व श्री दत्त मंदिर देवस्थान, खरोळा यांच्या संयुक्त...

Read more

महाराष्ट्रातील आत्मचरिञ साहित्य प्रकारातील ” जागरण ” चा  लातूर पॅटर्न 

अभय मिरजकर मराठी साहित्यात विविध प्रकारांच्या साहित्याचा समावेश आहे.  जसे की, कविता, कथा, निबंध, नाटक, तत्वज्ञान ,विवेचनात्मक साहित्य, आत्मचरित्र यामध्ये...

Read more

शिवजयंती निमित्त सेवा, समर्पण आणि संस्कारांचा गोड संदेश

निलंगा : स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे खरे राजे आणि अखंड प्रेरणास्थान असलेल्या यांच्या जयंतीनिमित्त निलंगा शहरात सामाजिक बांधिलकीचा आणि सेवाभावाचा सुंदर...

Read more

लातूरच्या औद्योगिक वाढीमुळे दर्जेदार सुविधांची गरज: मयूर गर्जे

पर्यटन-आतिथ्य क्षेत्राला मिळणार चालना लातूर फेब्रुवारी 2026: मराठवाड्यातील वेगाने विकसित होत असलेल्या लातूर शहराच्या पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला चालना देत...

Read more

गवळी समाजाच्या दुधाभिषेकाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेचा शुभारंभ

 जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण दर्शनासाठी भाविकांच्या मध्यरात्रीपासूनच रांगा हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला   लातूर /प्रतिनिधी : शनिवार व...

Read more

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे शुभहस्ते  रेणा साखर कारखाना येथे 4,21,111 व्या साखर पोत्याचे पुजन  संपन्न

रेणा कर्मचारी यांना 10 टक्के पगारवाढीची घोषणा.. दिलीपनगर निवाडारेणा सहकारी साखर कारखान्यातील गळीत हंगाम 2025-26 मधील उत्पादीत 4,21,111 व्या साखर...

Read more

मराठवाड्याच्या आतिथ्य सुविधांना बळकटी देत ‘एनराइज बाय सयाजी’चे लातूरच्या एमआयडीसी परिसरात उद्घाटन

~ लातूरमधील ‘एनराइज बाय सयाजी’मध्ये 30 खोल्या, प्रशस्त बँक्वेट हॉल्स आणि आधुनिक भोजन व्यवस्था – औद्योगिक पट्ट्याच्या मध्यवर्ती ठिकाणी समकालीन...

Read more

देवणी निवडणूक भत्ता प्रकरण : कर्मचाऱ्यांचा घाम, अधिकाऱ्यांचा घोटाळा?

लोकशाहीच्या उत्सवात कर्मचाऱ्यांवर अन्याय — चौकशीची जोरदार मागणी देवणी :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अहोरात्र मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा निवडणूक...

Read more
Page 2 of 73 1 2 3 73

Recommended

जिल्हाधिका-यांच्या पत्रास दाखविली कचराकुंडी———————————————-अतिक्रमण मान्य करत लेखी आश्वासन देऊनहीमनपा आयुक्त कार्यवाहीस का कचरत असावेत?————————————————धरणे-आंदोलनार्थींचा संतप्त जाहीर सवाल !लातूर, दि.०७, येथील स्वामी विवेकानंद चौक ते सिद्धेश्वर चौक या सरकारी सार्वजनिक रस्त्यामध्ये, कांही लोकांनी केलेले ते बेकायदा अतिक्रमण मान्य करूनही ते न काढता, मा. जिल्हाधिका-यांच्या आदेशा सह स्वतःच्याच लेखी आश्वासनासही कचराकुंडी दाखविणारे, मनपा आयुक्त हे प्रत्यक्ष कायदेशीर कार्यवाही करण्यास कचरतातच कसे ? असा जाहीर उद्वीग्न प्रश्न उपस्थित करून, या मार्ग मुक्तीसाठी ७ मार्च पासून अन्याग्रस्त कार्यकर्त्यांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयावर, पुनःश्च आपले बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.या बहुचर्चित अतिक्रमणाची संक्षिप्त माहिती अशी की, लातूर मनपा हद्दीमधील विवेकानंद ते सिध्देश्वर चौक शासकीय रस्त्यामध्ये, कृपासदन रोड जवळ दक्षिण व उत्तर बाजूनी ६ लोकांनी जब्बरदस्ती ने कच्चे अतिक्रमण केले आहे. म्हणून आजपर्यंत येथे पक्या नाल्या व रोड होऊ शकला नाही. त्यामुळे पावसासह या भागातील नित्य सांडपाण्याचा निचरा होत नाही. म्हणून या दलदल व दुर्गंधीमुळे, येथे सतत आरोग्य व रोगराईचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. याशिवाय शहराच्या मूळ गावभागात जाणारा, हा अत्यंत एक महत्वाचा प्रमुख पर्यायी रस्ता आहे. त्यामुळे पादचारी व वाहन धारकांची मोठी अडचण झाली आहे. सदर गैर अतिक्रमण हटवावे म्हणून, कांही नागरिक हे गेली २०-२२ वर्षे प्रयत्न करतात. एवढेच नव्हे तर ते अतिक्रमण २-३ वेळा हटविले गेले होते. मात्र मनपा ही त्याचवेळी तेथे पक्या नाली व रोड करत नसल्याने, ते अतिक्रमित पुन्हा परत रस्त्यावर पूर्ववत येतात. हे अतिक्रमित सुशिक्षित सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी या रस्त्यामध्ये कम्पाऊंड वालसह खाजगी गटारी, संडास टँक, पत्र्यांच्या शेडचे पानमहल बनविले असून, त्याचे ते खुशाल जाहीरपणे भाडेही खातात.मा. राज्य शासनाच्या चालू अधिवेशन काळात, या अशा मनमानी अन्याविरुद्ध, ” सार्वजनिक सरकारी रस्ता बचाओ नागरी कृती समितीच्या “वतीने जुलै २०२४ पासून, नागरिकांचा रितसर संघर्ष चालू आहे. मा. जिल्हाधिकारी यांनी मनप प्रशासनास ७-८ पत्र दिली. मनपाने वारंवार पाहणी करून, हे अतिक्रमण झाल्याचे लेखी मान्य केले. तरी पण स्वतः कांही ते काढत नाहीत. म्हणून शेवटी ६ जानेवारीस नागरिकांनी, मा. जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे- आंदोलन सुरु केले. तेव्हा २४ जानेवारीस मनपा आयुक्तांनी अवध्या १५ दिवसात हे अतिक्रमण हटविण्याचे, मा. जिल्हाधिकारी यांना व सत्याग्रहीना स्वतंत्र पत्राव्दारे लेखी आश्वासन दिले. त्यावर मा. जिल्हाधिकारी यांनी पण आंदोलनार्थीना एक लेखी पत्र दिले. त्यामुळे १९ व्या दिवशी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. दरम्यान मनपाने सदर रोडचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण केले. मात्र नेमके त्या अतिक्रमणाच्या ठिकाणचे अंदाजे ३० टक्के काम तसेच ठेवले. पाहणी, चर्चा व बैठकांचे सोपस्कारही उरकले. मात्र मनपाने अखेर ते अतिक्रमण काही काढले नाही. आणि तेथे नाल्या व रोडपण केलाच नाही. त्यांनी नेहमीच्याच त्यांच्या टाळाटाळ व अक्षम्य दिरंगाईचा पाढा काही सोडलाच नाही.त्यांच्या लेखी आश्वासन दीड महिना लोटला. शेवटी त्यांनी मा. जिल्हाधिका-यांच्या लेखी आदेशास व आयुक्तांच्या लेखी आश्वासनास, स्वतःच जाहीर हरताळ फासला. आणि नागरिकांची घोर फसवणूक केली. याचा जाहीर खेद व्यक्त करत, या रस्त्यामधील ते अतिक्रमण त्वरीती हटवून, तेथे उर्वरित पक्क्या नाल्या व रोड करावा म्हणून ७ मार्च रोजी सकाळी ११ वा. पासून, मा. जिल्हाधिकारी कार्यालयावर सामाजिक कार्यकर्ते रामकुमार रायवाडीकर यांनी, पुन्हा आपले बेमुदत धरणे- आंदोलन सुरु केले आहे. आणि त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री आदींना सादर केले आहे. रामकुमार रायवाडीकर यांच्या या सत्याग्रहात सक्रिय सहभागी होऊन, सूरज पाटील, वैजनाथ माने, पत्रकार शिरीषकुमार शेरखाने, रामदास ससाणे, बाबुराव झाकडे, बुद्धाजी कांबळे, रघुनाथ बेडदे, वलीभाई शेख, गणपतराव तेलंगे, संजय व्यवहारे, श्री श्याम प्रतापराय वरियाणी, पत्रकार बाळ होळीकर, प्रा. दिनकर कांबळे, बाबा शेख, श्री पंडितराव बंडे, अँड. डी एन भालेराव, माजी सरपंच श्री माधवराव गायकवाड, तिरभद्र इंदुलकर, जग्गनाथ सुरवसे, अगंदराव कांबळे, साथी अतिष नवगीरे, शत्रुघ्न कांबळे, सत्यभामा माने, भाऊसाहेब कांबळे, दत्तात्रय बेले, ऍड. मधुकर कांबळे, कॉ. दिगंबर सुर्यवंशीआदीनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.—————-प्रति, दि.०७/०३/२०२५महोदयकृपया वरील बेमुदत धरणे- आंदोलन वृत्त प्रसिद्ध करावे, ही नम्र विनंती.आपला विनित,- रामकुमार रायवाडीकर,लातूर.

Most Popular