• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

“राजकारण्यांना सत्कार करण्याची इतकी घाई का.!”

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
June 6, 2025
in Blog
0
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
         आय. पी.एल. च्या स्पर्धेमध्ये रॉयल चॅलेंज बेंगळुरू संघाने सतत 18 वर्ष झुंज दिल्यानंतर, त्यांना विजेतेपद मिळाले. त्याचा आनंद सर्वांनाच झाला. मी सर्वानाच अशा अर्थाने म्हणतो की,  आताच्या काळात, संघ कर्णधार विराट कोहली हा देशामध्ये सर्वांत लोकप्रिय खेळाडू आहे. त्याच्या चाहत्यांची लक्षणीय संख्या भारतासह जगभर आहे. म्हणुन त्याच्या संघाने जेतेपद मिळविले आणि देशभरात जल्लोष झाला. ते सहाजिक आहे. परंतु हा संघ कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या "बंगळुरु"  नावाशी निगडित असल्यामुळे, त्या राज्यात इतर ठिकाणांपेक्षा जास्त जल्लोष झाला. मंगळवारी रात्री 11.30 वाजता हा सामना संपून कोहलीचा संघ विजेता म्हणुन घोषित झाला. तो विजयी सोहोळा साजरा करण्यासाठी, काही तासांच्या अवधीत कर्नाटक सरकारने बंगळुरू येथे चेन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित केला. त्याला अलोट जनसमुदाय लोटणार.

तिथे प्रचंड गर्दी होणार. हे कुणीही सांगू शकले असते. त्या गर्दीला काबूत ठेवणे. ही जिकिरीची गोष्ट होती. त्यासाठी आवश्यक त्या नियोजनासाठी अवधी मिळणे आवश्यक होते. परंतु घाईघाईने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या
गर्दीला आटोक्यात ठेवण्यासाठी, आवश्यक ते नियोजन करण्यासाठी वेळ न मिळाल्यामुळे नियोजनात त्रुटी राहिल्या. म्हणुन त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. तिथे
अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लोक जमा झाले. त्यामुळे प्रचंड रेटारेटी झाली. त्यात जीव गुदमरून 11 जणांचा बळी गेला. हा आकडा वाढू शकतो. तसेच 50 पेक्षा अधिक लोक मृत्यूशी झुंज देत औषधोपचार घेण्यासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल झाले आहेत. हा झाला घटनाक्रम.


आता प्रश्न असा पडतो की,
संबंधित संघाचा कर्नाटक राज्य सरकारशी काय संबंध आहे? तो संघ खाजगी फ्रॅन्चायझीच्या मालकीचा आहे. हा समारंभ मालकांनी आयोजित करणे अपेक्षित होते. मग सिद्धरामय्या सरकारला इतकी घाई का झाली? इतक्या कमी वेळेत, नियोजनशुन्य समारंभ आयोजित करण्याची गरज होती का ? त्यांनी हा आटापिटा कशासाठी केला?
या अगोदर देशात अशाप्रकारचे सोहळे साजरे झाले नाहीत का? त्याची खूप उदाहरणे देता येतील. 1971 साली अजित वाडेकर ह्यांच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाचा पराभव करून, परतलेल्या विजयी भारतीय संघाची मुंबई विमानतळापासून खूप लांब पल्ल्याची आणि प्रचंड गर्दीची मिरवणूक कोण विसरेल? त्यांचा सत्कार समारंभ ही तितकाच दिमाखदार झाला. तेव्हापासुन 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथे निघालेली प्रचंड मिरवणूक,
सत्कार समारंभ अशा घटनांची पुष्कळ उदाहरणे देता येतील. परंतु आतापर्यंत कधीही आणि कुठेही
अशा प्रकारची मन सुन्न करणारी घटना घडली नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे की, जिथे क्रिकेटर आणि क्रिकेट, तिथे हमखास गर्दी. हे समीकरण माहीत असून देखील इतक्या घिसाडघाईने हा कार्यक्रम का आयोजित केला? ह्या आनंदाच्या क्षणात, आपल्या आवडत्या खेळाडू सह आनंद व्यक्त करण्यासाठी
प्रचंड गर्दीची खात्री असताना, त्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यास पोलीस दलाला आवश्यक अवधी का दिला नाही? ह्या घटनेला जबाबदार कोण? त्याची नैतिक जबाबदारी आतापर्यंत कुणी का स्विकारली नाही? विशेष म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ह्यांनी तर सांगून टाकले की, स्टेडियमची क्षमता 35, 000 इतकी असतांना, तिथे अडीच, तीन लाख लोक जमा झाल्यामुळे हा दुर्दैवी प्रकार घडला. म्हणजे बेसुमार गर्दी होणार हे त्यांना माहीत नव्हते का?
हा सत्कार समारंभ इतक्या घाईघाईने आणि नियोजनशून्य पद्धतीने आयोजित करण्यास एकच कारण आहे ते म्हणजे राजकारण्यांना संधीचा अचूक फायदा करून घेण्याची अतिशय घाई असते. “पळा, पळा, कोण पुढे पळे तो” ह्या उक्ती नुसार सर्वांत आधी सत्कार समारंभाचे आयोजन केल्याचे श्रेय घेण्यासाठी ही घाई केली गेली. त्याची शेखी पुढील काळात मिरवण्यासाठी हे बळी दिले असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण क्रिकेट हा खेळ आणि तो खेळणारे क्रिकेटपटू हे कायम भारतीयांच्या गळ्यातले ताईत
आहेत. भारतियांना क्रिकेटची फक्त आवड नसून, त्याचे वेड आहे. भले ही एखाद्या व्यक्तीला, त्या खेळातील ओ की ठो कळत नसेल, पण तो तन्मयतेने दूरदर्शनवर क्रिकेटचे सामने पाहतो. त्यात समरस होऊन आनंदी होतो. भारतीय संघ पराभूत झाल्यास, स्वतः पराभूत झाल्याचे दुःख होते. किंवा एखाद्याची ऐपत असेल तर सामन्याचे तिकीट काढून, प्रत्यक्ष सामना बघण्याचा आनंद घेतो. स्टेडियममध्ये असे अज्ञानी लोक खूप भेटतील. पण खेळ प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसतो. कर्नाटक सरकारने नेमके हेरले. त्याचे श्रेय घेण्यासाठी घिसाडघाईने हा कार्यक्रम आयोजित केला. ह्याबाबत पोलीस दलाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. कारण इतक्या मोठ्या समारंभाचे, योग्य नियोजन करण्यासाठी अवधी आवश्यक असतो. तो पोलीस प्रशासनाला मिळाला नाही. ह्याला जबाबदार फक्त कर्नाटक राज्य सरकार आहे. आता त्यांनी म्हणे चौकशी समिती नेमली आहे. माझे तर असे म्हणणे आहे की, आपल्या देशात आतापर्यंत किती चौकशा समित्या नेमल्या? त्याचे फलित काय निघाले? ह्या समित्यांची चौकशी करण्यासाठी, एक नवीन चौकशी समिती नेमून, त्यातून काय निष्पन्न झाले? ह्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याची मागणी करायला पाहिजे.असे म्हंटले तर तर तो विनोद होणार नाही.आजपर्यंत अगणित चौकशी समित्या नेमण्यात आल्या आहेत.
शेवटी काय! तर जाणाऱ्यांचा
जीव गेला आणि जे जखमी होऊन उपचार घेताहेत, त्यांच्या नशिबात पुढे काय लिहून ठेवले आहे? हे आताच सांगणे कठीण आहे. किमान पुढच्या काळात तरी राजकारण्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन करू नये. ते काम संघाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांचे आहे किंवा आय. पी. एल. सारख्या फ्रॅन्चायझी सारख्या मालकांचे आहे. त्यांना संधी दिलीत, तर ते नियोजन पूर्वक कार्यक्रमाची आखणी करून, त्याची योग्य ती अंमलबजावणी करून, कार्यक्रमाला गालबोट न लागता,
यशस्वी करतील. त्यामुळे असे प्रसंग निश्चितपणे टाळता येतील. संबंधित क्रिकेट संघटनांस मी फार फार तर विनंती करू शकतो की, अशा कार्यक्रमांना राजकिय व्यक्तींना सन्मानाने उपस्थित राहण्यास विनंती करा.

अरुण निकम.
9323249487.
दिनांक…05/06/2025.

Previous Post

कामगारांच्या थेट इशाऱ्याने मनपा हादरली! मंगळवारपासून लातूर शहर ‘कचऱ्यात’ बुडणार!

Next Post

विकसित कृषि संकल्प अभियानाच्या माध्यमातून कृषि शास्त्रज्ञ शेतकर्‍यांच्या दारी”

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

विकसित कृषि संकल्प अभियानाच्या माध्यमातून कृषि शास्त्रज्ञ शेतकर्‍यांच्या दारी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved