
.
लातूरःदि.२७जुलै २०२५.
बुद्ध धम्म वर्षावास पुनित पर्वा निमित्ताने वैशाली बुद्धविहार बौद्धनगर लातूर येथे पु.भिक्खु सुमेधजी नागसेन यांच्या धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी भ.बुद्ध व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना पुष्प व पुष्पमाला आर्पण करण्यात येवुन बुद्धवंदना घेण्यात आली.
यावेळी बोलताना सुमेधजी नागसेन म्हणाले कि ,माणसाने बाह्यअंगाने नव्हे तर मनाने निर्मळ असण्याची गरज आहे. आपल्या कर्मा मुळेच चांगले अथवा वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणुन आपण नेहमी -नेहमी सत्कर्म केले पाहिजे .एकमेकांचे ऐकत जावे,जेष्ठांचा सन्मान करा नेहमी नेहमी शीलाचं पालन करा व नेहमी सत्कर्म करा, आसे आनेक कथा व रुपकाच्या माध्यमातून आपल्या धम्मदेसनेत सांगितले .

यावेळी राम कोरडे यांनी भोजन दान तर राजु कांबळे यांनी खिरदान केल्याबद्दल तर प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल प्रा. डाॕ. दुष्यंत कटारे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमातभरत कांबळे,महादु गायकवाड ,सुर्यभान लातूरकर,गौतम चिकाटे,डि. के कांबळे,जगन्नाथ सुरवसे,ईश्वर कांबळे,कुमार सोनकांबळे,लता चिकटे,,आशा बानाटे,सविता चिकाटे,लता गायकवाड ,लता कांबळे,आशा गायकवाड , ललीता सिरसाटयांचेसह बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.केशव कांबळे यांनी सुत्रसंचलन केले.

