• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

निवृत सभासद हे फक्त संघटना सदस्य राहिले नाही तर ते संघटना जगले* 

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
April 21, 2025
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

    *——- कॉ.देविदास* *तुळजापूरकर* 

लातूर दि. 20* : “तुम्ही निवृत्त सभासद केवळ संघटनेचे सभासद होता,असे नाही तर तुम्ही संघटनेचे विचार व संघटना अक्षरशः जगलात. ज्यामुळे आम्ही सुद्धा घडू शकलो. आपण संघटने वरती विश्वास दाखवून नेहमी संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून क्रियाशील राहिलात म्हणूनच आज ए. आय. बी. ई. ए. ही आपली लाडकी संघटना आठ दशकांचा प्रवास गौरवाने पूर्ण करते आहे,”असे गौरवोद्गार ए. आय. बी.इ.ए.या बँक कर्मचारी संघटनेचे जॉइंट सेक्रेटरी कॉ. देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले.

लातूर येथे संघटनेच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त लातूर येथे आज बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, औरंगाबाद च्या वतीने आज सेवानिवृत्त सभासदांच्या कृतज्ञता सोहळ्यात बोलताना ते पुढे म्हणाले की,”दि. 20 एप्रिल 1946 साली स्थापन झालेल्या देशातील बँक कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना या तुमच्या दृढसंकल्प निष्ठा आणि त्याग यामुळेच आज ही गौरवशाली वाटचाल सुरू आहे.”

संपूर्ण देशभरामध्ये विविध उपक्रमांनी संघटनेचा 80 वा वर्धापन दिन साजरा केला गेला. लातूरमध्ये सुद्धा या निमित्त ‘रक्तदान शिबिर ‘व ‘सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा’ आयोजित करून वर्धापन दिन साजरा केला गेला. यावेळी बोलताना कॉ. तुळजापूरकर पुढे म्हणाले की,” ए.आय.बी.इ.ए.या पाच जादुई अक्षरामुळे आज अनेकांच्या आयुष्यात क्रांती आलेली आहे. त्यांना सन्मानाने व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी या संघटनेने दिली. अनेकांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य निर्माण केले. या संघटनेने बारा द्विपक्ष करार मिळवून दिले तसेच सन्मानजनक सेवाशर्तीही मिळवून दिलेल्या आहेत. ए.आय. बी.इ.ए.हा एक विचार आहे ,जो केवळ कर्मचाऱ्यांच्या हितासाठीच नव्हे तर या देशातील कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या हितासाठी, ग्राहकांच्या ठेवींचे व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा नेहमी अग्रेसर राहिलेला आहे, आणि यासाठीच्या कृतिशील लढ्यातील तुमचे योगदान विसरणे शक्य नाही.”

        संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. धनंजय कुलकर्णी यांनीही उपस्थित सदस्या सोबतच्या संघटनेतील काम करतानाच्या अनेक आपल्या अध्यक्षीय भाषणात उजाळा दिला. ते म्हणाले की,”90 च्या दशकामध्ये सभासदांच्या संघटनेमध्ये असणाऱ्या क्रियाशील सहभागामुळे त्यांच्यामध्ये जैव संबंध तयार झाले ज्याचा प्रत्यक्ष परिणाम संघटनेच्या सक्षमीकरणांमध्ये झाला व याच सक्षम संघटित ताकतीच्या जोरावर मुजोर व्यवस्थापनाला वठणीवर आणण्याचे काम संघटनेने वेळोवेळी केले आहे. म्हणूनच सेवानिवृत्त झालेली ही पिढीने स्वाभिमानाने नोकरी कशी करायची याचा वस्तू पाठ या सर्व तरुणांसमोर घालून दिलेला आहे. सरकार खाजगीकरणाबाबत मोठ्या आवाजात बोलत असताना पुन्हा एकदा या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याप्रमाणे आपला सहभाग संघटनेमध्ये वाढविणे व सक्षम संघटित ताकद उभी करणे ही काळाची गरज असून त्याशिवाय खाजगीकरणाचे भूत आपण परतवून लावू शकणार नाही.आज नोकरभरती जवळपास बंद आहे, ज्याचा विपरीत परिणाम ग्राहकसेवा आणि आपल्या ग्राहकांच्या संबंधात अंतर पडत आहे. ते संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नोकर भरतीचे आंदोलन संघटना करीत आहेच, त्यात या ज्येष्ठांनी सहभाग नोंदवून आपल्या बँकेच्या प्रतिमेस पुन्हा उंचीवर न्यावे.”

    आपल्या प्रास्ताविकात या कार्यक्रमाचे प्रयोजन स्पष्ट करताना संघटनेचे तरुण नेते आणि सचिव कॉ. दीपक माने म्हणाले की, “एखाद्या कामगार संघटनेस आठ दशकांचा इतिहास असावा, ही खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. या आठ दशकामध्ये संघटनेत फूट पाडण्याचे सरकार व व्यवस्थापनाकडून वेळोवेळी प्रयत्न झाले .परंतु सभासदांचा संघटने वरती व संघटनेच्या नेतृत्वावरती असलेल्या विश्वासामुळेच व त्यांच्या सक्रियतेमुळेच ही संघटना आपला आठ दशकांचा अभिमानास्पद प्रवास पूर्ण करू शकली. 1946 मध्ये लावलेल्या या रोपट्याचे आज महावृक्षामध्ये जे रूपांतर झाले आहे ,त्यामध्ये अनेकांचे कष्ट व त्याग समाविष्ट आहेत. सेवानिवृत्त झालेल्या तुम्हा सर्वांनी सलग 40 वर्ष या संघटनेचा झेंडा प्रखर संघर्षातून एका उंची वरती नेऊन ठेवला आहे व तोच वारसा आता आम्हालाही येथून पुढे घेऊन जावयाचा आहे‌. त्यासाठी आपले मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला मिळणारच आहे परंतु आजपर्यंत तुम्हा सर्वांचा हा प्रवास आम्हासाठी प्रेरणादायी असणार आहे, म्हणूनच तुमच्या या कार्यप्रति कृतज्ञता म्हणून आज ज्या लोकांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेली आहे त्या सर्वांना संघटना या ठिकाणी सन्मानित करीत आहे.”

सेवानिवृत्त कर्मचारी कॉ. शरद बोर्डे , कॉ.सुभाष आराध्य यांनी संघटनेबद्दलच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. उत्तम होळीकर यांनी केले तर आभार जॉइंट सेक्रेटरी कॉ. सुधीर मोरे यांनी केले. या कार्यक्रमास कॉ.विलास भुमकर, कॉ.अनंत अघोर, कॉ. धानेश्वर कातळे, कॉ.सुधाकर मांडे, कॉ.मल्लिकार्जुन माळी, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष कॉ.लक्ष्मीकांत मांडवेकर यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी  उपस्थित होते. त्या सर्वांचा सत्कार यावेळी कॉ.तुळजापूरकर आणि कॉ. कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॉ.उदय मोरे, कॉ.प्रकाश जोशी, कॉ. श्रीकृष्ण मांडे यांनी प्रयत्न केले.

Previous Post

ॲग्रीस्टॅक : शेतकऱ्यांची डिजिटल ओळख

Next Post

सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ.देविदासराव रामराव कुलकर्णी चाकूरकर यांचे निधन*

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ.देविदासराव रामराव कुलकर्णी चाकूरकर यांचे निधन*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved