• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

सामाजिक समतेचा साज — लातूरमध्ये ‘व्ही. एस. पँथर्स’च्या वतीने ३८ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
May 18, 2025
in Blog
0
0
SHARES
33
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘व्हिजन फॉर सोशल जस्टिस’च्या उपक्रमातून सामाजिक समतेचा संदेश; आतापर्यंत १८८ जणाचा विवाह सोहळ्यांचे आयोजन

लातूर, ता. १८ (प्रतिनिधी):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक समता आणि माणुसकीची शिकवण अंगीकारत ‘व्हिजन फॉर सोशल जस्टिस’ अर्थात ‘व्ही. एस. पँथर्स’ या संस्थेच्या वतीने लातूर येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात एकूण ३८ नवविवाहित जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले.सामाजिक समतेचा संदेश देत, धर्म आणि जातीच्या सीमा ओलांडणारा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला. ‘

या सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी स्वतः उपस्थित राहून जोडप्यांना शुभाशीर्वाद दिले. विवाह मंडपात विविध धर्म, जात, वंचित व गरजू कुटुंबांतील वधूवर एकत्र आले होते. यामध्ये २ मुस्लिम, १५ हिंदू आणि उर्वरित बौद्ध समाजातील नवविवाहितांचा समावेश होता.

या सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक सलोखा, जातिनिरपेक्षता आणि समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाचे हे सलग सहावे वर्ष असून, आतापर्यंत एकूण १८८ जोडप्यांचे विवाह या माध्यमातून पार पडले आहेत, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी दिली.

Download
Download

ठळक मुद्दे:

  • ३८ नवविवाहित जोडप्यांचा सामूहिक विवाह
  • २ मुस्लिम, १५ हिंदू आणि २१ बौद्ध समाजाचे वधूवर सहभागी
  • विवाहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ही ऐतिहासिक जागा
  • हजारो नागरिकांची उपस्थिती आणि शुभेच्छांचा वर्षाव
  • विवाह खर्चाच्या अनाठायी ओझ्यावर समाजोपयोगी पर्याय

या प्रसंगी विविध स्तरातील मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. सोहळ्याला आलेल्या नागरिकांनी नवदांपत्यांना भरभरून आशीर्वाद दिले. “हे केवळ विवाह नव्हते, तर सामाजिक समतेचा आणि माणुसकीचा एक प्रेरणादायी सोहळा होता,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. यावेळी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर ,आमदार अभिमन्यू पवार ,माजी मंत्री विनायकराव पाटील ,माजी आमदार बब्रुवान खंदारे शिक्षक आमदार विक्रम काळे,माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष विनोद खटके म्हणाले, “विवाहात होणारा खर्च अनेक कुटुंबांच्या पाठीवरचा आर्थिक भार ठरतो. सामूहिक विवाह उपक्रम हे त्या भारातून सुटका करून समाजाला एकसंध ठेवण्याचे साधन आहे.”


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला “समतेचा समाज” घडवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. जातीधर्मपलीकडचा मानवी एकोपा, साधेपणाचा स्वीकार, आणि सामाजिक जबाबदारीची भावना याचा सुंदर संगम या सामूहिक विवाहात दिसून आला. हे केवळ एक लग्नसमारंभ नव्हता, तर समाजपरिवर्तनाची एक झलक होती.

Previous Post

बार्शी लाईट रेल्वे: लातूरच्या काळजाचा हळवा श्वास — युवराज विनायकराव पाटील

Next Post

सिंदूर पुसणाऱ्या घटनादुरुस्तीचे काय करणार?

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

सिंदूर पुसणाऱ्या घटनादुरुस्तीचे काय करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1
लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

May 10, 2026
नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

May 10, 2026

Recent News

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

May 10, 2026
नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

May 10, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

May 10, 2026
ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

May 10, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved