• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात अभियांत्रिकी : शिकण्याची आणि कारकिर्दीची नव्याने आखणी – डॉ. संजय शितोळे

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
June 25, 2025
in Blog
0
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रमुख, माहिती तंत्रज्ञान विभाग, यूएमआयटी, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई

आज आपल्या आजूबाजूला एक शब्द सारखा ऐकू येतो AI, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, काहीजण त्याला क्रांती म्हणतात, काहीजण भीती. पण खरं काय? आपल्या शिक्षण, कामकाज आणि दैनंदिन आयुष्यात तो खरंच मोठा बदल घडवतो आहे. अनेकांना प्रश्न पडतो की, ‘AI मुळे आपली नोकरी जाईल का? काही नोकऱ्या खरंच बदलतील, काही बंदही होऊ शकतात. पण खरी गोष्ट अशी आहे की AI काही कामं घेऊन जाईल, पण नवीन प्रकारची कामं घेऊनही येईल. आपल्याला ती स्वीकारायला आणि तयार राहायला हवं. जर आपण योग्य पद्धतीने AI शिकून घेतलं, तर आपण त्याच्यासोबतच वाढू शकतो.

भारताची मोठी ताकद म्हणजे आपली युवा पिढी. आपल्याकडे ८० कोटीहून अधिक तरुण लोक आहेत. त्यापैकी अनेकजण आयटीमध्ये काम करत आहेत. अंदाजे ५८ लाख लोक माहिती तंत्रज्ञान आणि व्यवसाय प्रक्रियापन (IT-BPM) क्षेत्रात कार्यरत आहेत, ही तरुणाईची उर्जा, आणि देशात उपलब्ध असलेल्या संधी, जर योग्य दिशेनं वापरल्या, तर भारत AI मध्ये अग्रेसर होऊ शकतो. पण आजही ७२.६% लोकांना व्यावसायिक प्रशिक्षण मिळालेलं नाही. हे अंतर आपण शिक्षणपद्धती आणि शिकण्याच्या सवयी बदलून भरून काढायला हवं.

काही लोक असं मत मांडतात की, AI आल्यानंतर कोडिंग शिकण्याची गरजच राहणार नाही. हे खरं नाही. कोर्डिंग शिकणं अजूनही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला संगणक कसा विचार करतो हे समजतं. एक प्रोग्रामिंग भाषा उत्तम प्रकारे समजली, की इतर भाषाही सहज शिकता येतात. त्याचबरोबर, स्वच्छ विचार, इतरांबरोबर काम करण्याची तयारी, आणि स्पष्ट संवादकौशल्य हे गुणदेखील तितकेच आवश्यक आहेत, यालाच आपण soft skills म्हणतो.

AI च्या या नव्या युगात आपण काय केलं पाहिजे? अगदी पहिलं पाऊल म्हणजे स्वतःला ओळखणं, आपल्याला काय जमतं? काय शिकायला आवडतं? याचं प्रामाणिक उत्तर शोधा.

प्रत्यक्ष काम करत शिकायला सुरुवात करा. प्रकल्पांमध्ये सहभागी व्हा, टीममध्ये काम करा. AI ची भीती बाळगू नका-त्याला आपला हुशार सहकारी समजा.

सतत शिकत रहा, नवीन गोष्टी समजून घ्या. यश मिळवायचं असेल, तर शिकणं कधीही थांबवू नका. AI विरोधात नाही, तर त्याच्यासोबत काम करा.

अहवाल सांगतात की, सुमारे २५ ते ३० टक्के काम AI मुळे आपोआप होऊ शकतं. पण त्यामुळे संधी बंद होत नाहीत त्या नव्या रूपात समोर येतात.

विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी शाळा आणि कॉलेजांनीही बदलले पाहिजे. अभ्यासक्रमामध्ये लवकरच AI बद्दल शिकवायला हवं. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्राशी संबंधित कोडिंग शिकावं. AI चे साधनं प्रत्यक्ष वापरून पाहावीत. आणि वेगवेगळ्या विषयांमधून मिळालेल्या ज्ञानाने समस्या सोडवायला शिकावं. जुना अभ्यासक्रम पुरेसा नाही-उद्याची तयारी लागते.

AI मुळे अभियांत्रिकी संपणार नाही- ती नव्याने सुरू होईल. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण एक अशी पिढी घडवली पाहिजे जी AI समजून घेणारी, सजग, सर्जनशील आणि जगाच्या स्पर्धेसाठी तयार असेल,

माझ्या ३० वर्षाच्या अध्यापनातील अनुभवातून मला हे स्पष्ट वाटतं जो शिकणं सोडत नाही, त्याला कुठलीही यंत्रणा मागे टाकू शकत नाही.

Previous Post

महावितरणच्या मंडळ कार्यालयाचे स्थलांतर

Next Post

” घर परिवार:

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

" घर परिवार:

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved