• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

लातूर येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
August 15, 2025
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर, दि. १५ : जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री. भोसले बोलते होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार बांधव, विद्यार्थी, पालक व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील पायाभूत सुविधा बळकटीकरणाला गती देण्यात आली आहे. लातूर शहराच्या २९० कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे. तसेच जिल्ह्यात जलसंधारण आणि शेती क्षेत्राच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना, जलयुक्त शिवार अभियान आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार यासारख्या योजनांमुळे शेतीला बळ मिळत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. जिल्ह्यातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत आतापर्यंत ८८२ किलोमीटर लांबीचे ६७८ रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत. लवकरच या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून जिल्ह्यातील २७ आरोग्य संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन मिळाले आहे. यासोबतच गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून सहाय्य मिळवून देण्यासाठी जिल्हास्तरावर कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षामार्फत अवघ्या तीन महिन्यात १४३ रुग्णांना अर्थसहाय्य मिळवून देण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. भोसले म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. आता या मोहिमेचा दीडशे दिवसांचा दुसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स सुधारणा, आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा यांवर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्हा परिषदेने व्हाटसअप चॅटबोट उपक्रम सुरु केला आहे. यामाध्यमातून नागरिकांना जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत माहिती व्हाटसअपवर मिळेल. नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान केल्यामुळे उदगीर उपविभागीय कार्यालय, लातूर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला आयएसओ मानांकन मिळाले असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

जवळपास ८० हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. या योजनेतून जिल्ह्यात ४७ सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून यामधून २३० मेगावॉट वीज निर्मिती होत आहे. त्यामुळे जवळपास ८८ हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज मिळत असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, आदिशक्ती अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

महिलांच्या सशक्तीकरणासाठी राज्य शासनाने आदिशक्ती अभियान सुरु केले आहे. याअंतर्गत महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच यंदा प्रथमच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविले जाणार आहे. गावा-गावांमध्ये विकासाची निकोप स्पर्धा निर्माण होण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

पर्यावरण संवर्धन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

राज्यातील सर्वात कमी वृक्ष असलेल्या जिल्ह्यांमध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश होतो. हे चित्र बदलण्यासाठी ‘आपलं लातूर हरीत लातूर’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होवून प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे, असे आवाहन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

ध्वजारोहणानंतर पोलीस उपनिरीक्षक रामदास मिसाळ यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांचा पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध योजना, उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, विद्यार्थी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.


Previous Post

लातूर येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

” सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा ” कार्यक्रमाचे आयोजन

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

" सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा " कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved