• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

शेतकऱ्यांना जगवण्यासाठी शासनाची मोठी मदत आणि कर्जमाफीची गरज

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
September 25, 2025
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार
खचून जाऊन टोकाचे पाऊल उचलू नका

  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

लातूर तालुक्यातील मौजे तांदुळवाडी येथे शेतकऱ्यांना धीर दिला

लातूर दि.२५(प्रतिनिधी)- शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. शेत जमीनच वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना जगवण्यासाठी शासनाची मोठी आर्थिक मदत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी ची गरज आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.तुम्ही खचून जाऊ नका, टोकाचे पाऊल उचलू नका अशी कळकळीची विनंती ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी लातूर तालुक्यातील मौजे तांदुळवाडी आणि तांदुळजा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना नेते संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मिलींद नार्वेकर, संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण, माजी आमदार दिनकर माने, आमदार अमित देशमुख, माजी आमदार धीरज देशमुख, शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, संतोष सोमवंशी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नंतर उध्दव ठाकरे यांनी ही सर्व परिस्थिती शासनापर्यंत पोहोचवणार असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कठीण परिस्थितीत आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. कोणीही खचून जात टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांनी केले आहे.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना सरकारने केलेली मदत पुरेशी आहे का ? असा सवाल उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केल्यावर शेतकरी म्हणाले की, सर्व जमीनच वाहून गेली आहे. आता नवीन माती आणून टाकण्यापासून अनेक कामे आहेत. त्यामुळे सरकारने हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, तसेच कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जमीनच वाहून गेल्याने पुढील हंगामही अडचणीत आला आहे. मुख्यमंत्री आले आणि निघून गेले, त्यांनी आमच्या समस्याच जाणून घेतल्या नाही असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
केवळ पिकांचे नुकसान झाले आहे असे नाही तर जमीनच वाहून गेली आहे. शेतकरी किती अडचणीत आला आहे, याची सरकारने जाणीव ठेवावी, आता शेतकऱ्यांना जगवण्यासाठी मोठी मदत आणि कर्जमाफीची गरज असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मराठवाडा म्हणजे दुष्काळी भाग आहे, येथे अवर्षण हे नेहमीचे आहे. मात्र, पहिल्यांदाच येथे अतिवृष्टी झाली असून पूरपरिस्थितीचे मोठे संकट ओढवले आहे. आता त्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. सरकारने जाहीर केलेली मदत 2023 च्या निकषांप्रमाणे आहे. त्यामुळे येथील नुकसान पाहता सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. सरकारने जाहीर केलेली मदत वेळेवर येते की नाही, याकडेही लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारसमोर लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कर्जमुक्तीची मागणीही सरकारकडे लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

पीएमश्रीचा मान मिळालेल्या आदर्श शाळेच्या मुख्याध्यापकांची अचानक बदली : विद्यार्थी व पालक रस्त्यावर, शाळा ठप्प!

Next Post

सरपंचानी  पैशाचे बंडल तहसिलदाराच्या अंगावर फेकत संताप व्यक्त केला आहे.

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

सरपंचानी  पैशाचे बंडल तहसिलदाराच्या अंगावर फेकत संताप व्यक्त केला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1

जागतिक महिला दिनानिमित्त शेतकरी महिलांना स्वयम् शिक्षण प्रयाेगतर्फे गांडुळ खत निर्मिती संच व बियाणे संच वितरण

1

सिरीजमध्ये स्मार्ट मीटर बसवून वीजग्राहकांचे समाधान

July 20, 2026

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

March 16, 2026

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

March 15, 2026

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 14, 2026

Recent News

सिरीजमध्ये स्मार्ट मीटर बसवून वीजग्राहकांचे समाधान

July 20, 2026

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

March 16, 2026

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

March 15, 2026

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 14, 2026
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

सिरीजमध्ये स्मार्ट मीटर बसवून वीजग्राहकांचे समाधान

July 20, 2026

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

March 16, 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved