• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

वाचू आनंदे

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
October 15, 2025
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
            माझ्या बालपणापासूनच पाठ्यपुस्तकांबरोबरच अवांतर वाचन करायला पाहिजे असा अलिखित नियम आमच्या घरी होता. आजही तो आहे. आई-बाबा वाढदिवसाला मला नेहमी पुस्तक भेट द्यायचे कारण त्यांनाही वाचनाची खूप आवड होती  माझं वाचन यामुळे वाढत गेलं आणि पुस्तक हाच माझा मित्र बनला. आपल्या भावना चांगल्या प्रकारे मांडायला मला पुस्तकांनीच शिकवलं. वाचाल तर वाचाल"  हा मानवी व्यक्तिमत्व विकासासाठी अमूल्य असा संदेश आहे. वाचन करणारी व्यक्ती अधिक प्रगल्भ व वैचारिक कक्षाने रुंदावलेली असते. 

            प्रत्येकाच्या आयुष्यात काही व्यक्ती अशा लाभतात की, ज्यामुळे आयुष्याचं सोनं होवून जातं. हे त्यांच्या सहवासामुळे आणि प्रेरणेमुळे घडतं. त्यांची प्रेरणा आपल्याला उद्युक्त करत असते. चांगल्या सवयी जपण्यासाठी आपलं मन वळवत असते. अशा प्रेरणेतून चांगले संस्कार रुजले जातात. थोर पुरुषांचे चरित्र वाचून आपण प्रेरणा घेणे हा त्याचाच एक मुख्य भाग आहे.

         भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 1जन् दिवस " वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा करण्यात येतो.  कलाम यांचे वाचनावरचे अतोनात प्रेम आणि ज्ञान मिळवण्याची त्यांची जिद्द यातूनच या दिवसाची प्रेरणा मिळते. या दिवसाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि समाजात वाचन संस्कृती रुजवणे हा आहे. 

     पृथ्वीतलावरील प्रत्येक माणसाला वाचनाचे महत्व समजले तर तो स्वतः परिस्थितीवर मात करायला शिकेल आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबालासुद्धा संघर्षाशी सामना करायला शिकवेल. एकदा का विचारांची पातळी बदलली की, समाजपरिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही एवढी मोठी शक्ती वाचनात आहे.

     *Reading makes a man perfect*  असं फ्रांसिस बेकन या प्रख्यात विचारवंत आणि निबंधकाराने म्हटलं आहे. वाचनाने मनुष्य परिपूर्ण होतो. वाचनाच्या अनुषंगाने बहुश्रुत होतो.  त्याच्या ठायी विशाल दृष्टिकोण प्राप्त होतो.

         तज्ज्ञांच्या मते, *"पुस्तकं वाचण्यानं मेंदू सतत सक्रिय राहतो. वाचनाच्या सवयीतून एकप्रकारे मेंदूचा व्यायाम होतो. शिवाय स्मरणशक्ती व मेंदूच्या क्षमतेत वाढ होते."* या कारणामुळे सर्वांनीच पुस्तकं वाचण्याची सवय लावून घ्यायला हवी. 

                    तसेच, एकाग्रता वाढवण्यासाठी पुस्तक वाचण्याची सवय लावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक जण कामात एकाग्रता साधू शकत नाहीत. ती एकाग्रता पुस्तके वाचल्याने साधू शकते. पुस्तकं वाचल्यानं आपण दररोज नवनवीन गोष्टी शिकत राहतो. यामुळे आपला मेंदू तणावापासून दूर राहण्यास मदत होते.

  वाचनाचा महिमा महान लोकांनीही सांगितला आहे. लोकमान्य टिळक म्हणतात की, *"जर मला वाचनासाठी पर्याप्त पुस्तके उपलब्ध झाली तर मी नरकामध्ये देखील आयुष्य व्यतीत करेन."* पुस्तकाने ज्ञान मिळते व ज्ञानाने आत्मसम्मान  वाढतो. ज्याचा छंद वाचन करणे असतो असा माणूस कधीच एकटा नसतो.  पुस्तके आपले सर्वात चांगले मित्र असतात. ते आपल्याला ज्ञान तर देतात पण त्यासोबतच आपले मनोरंजन देखील करतात.

              पुस्तके आपल्याला आयुष्याचे धडे देतात. कारण प्रत्येक पुस्तकाचे विषय वेगळे असतात. प्रत्येक लेखक त्याच्या पुस्तकातून आपल्याला आयुष्याचे वेगवेगळे अनुभव देण्याचे काम करत असतो. त्यामुळे जितकी जास्त पुस्तके आपण आयुष्यात वाचतो, तितके आपण विचारांनी प्रगल्भ बनतो. आपल्या डिक्शनरीत  नवनवीन शब्दांची भर पडते. त्याचप्रमाणे कोणत्या परिस्थितीत कसे वागावे? याचे देखील आपल्याला त्यातून शिक्षण मिळते. म्हणजेच काय तर पुस्तके आपल्याला खूप काही शिकवून जातात. वाचल्याने स्मरणशक्तीवरही चांगला परिणाम होतो. या सवयीमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

          *"ज्या घरी नाही पुस्तकाचे कपाट ते घर होईल भुईसपाट"* असे म्हटले जाते. वाचन हा एक संवाद आहे. लहान मुलांनी तर पुस्तकांचे वाचन हे मोठ्यानेच करायला हवे. त्यामुळे शब्दांच्या उच्चाराला धार येते आणि वेग वाढतो. उज्ज्वल भविष्य घडवायचे असेल, स्पर्धा परीक्षेत टिकायचे असेल तर पुस्तक वाचणे आवश्यक आहे. आज सोशल मीडियामुळे वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून प्रत्येकाने काहीतरी वाचन करावे. 

दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे

पुस्तक वाचन आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होणे आवश्यक आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक ठराविक वेळ वाचनासाठी ठेवावी. किंवा झोपताना देखील पुस्तक वाचले तर झोप शांत व छान लागते.

               पुस्तकांचे जगच विलक्षण आहे. खरा वाचक शांतपणे, निवांतपणे वाचनाचा आनंद घेताना, पुन्हा मागची पाने वाचण्यात गुंग होतो. वाचनामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता वाढते. एखादे पुस्तक, पुस्तकातले पान आयुष्य बदलवते. त्यातले एखादे वाक्य आयुष्याचे धेय ठरवू शकते. एवढी ताकद त्या वाचनात आहे. रामायण, महाभारत, भगवद्गीता, पंचतंत्र यातून भारतीय जीवनमूल्य प्रतिबिंबित होतात. वाचन ही एक श्वासोच्छ्वासाइतकीच अत्यंत आवश्यक बाब आहे. परीक्षांच्या व अभ्यासक्रमाच्या पलीकडे व्यक्तिमत्त्व विकासाचे एक माध्यम म्हणून आपण वाचलेच पाहिजे.

          वाचनाशी माणसाची मैत्री असावी कारण मोठ्या रस्त्याने दुतर्फा लावलेली झाडे पांथस्थास जशी सावली देतात व सुखाच्या प्रवासात सोबतीने भागीदारी करतात तसं मानवी जीवनप्रवासात पुस्तके ही जीवनप्रवास समृद्ध करतात.सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पानापानातूनच आखला जातो. आपल्या मराठी भाषेतही विपुल साहित्यसंपदा उपलब्ध आहे.

वि.स.खांडेकर,वि.वा.
शिरवाडकरांपासून ते आज पर्यंतच्या भालचंद्र नेमाडे यांच्या पर्यंत आणि रविन्द्रनाथ टागोरापासून गुलजारसाहेबांपर्यंत..

“लिहणा-याने लिहीत जावे…
वाचणा-याने वाचीत जावे
कधीतरी वाचणा-याने लिहणा-याचे शब्द घ्यावे..”
इतकं सुंदर आहे हे वाचणं!

    वाचनाने आपली भाषा, विचार समृद्ध होत जातात. माझ्याकडे इतकी संपत्ती, इतका जमीनजुमला आहेअसले फुकाचे अंहकार वाचनाने पार नष्ट होऊन जातात. विचारांची ही श्रीमंती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.

वाचनाने विचार आणि वाचा यांत प्रगल्भता येते.

         मात्र आज समाजात मोबाईल, इंटरनेटचं प्रस्थ वाढत असताना अनेक लोकांनी पुस्तकं वाचण्याच्या सवयीला तिलांजली दिली आहे. सध्या खूप कमी लोक पुस्तकं वाचतात. जेव्हा मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब आले नव्हते तेव्हा वेळ सत्कारणी घालवण्यासाठी लोकं पुस्तकं वाचायचे. पण आज मात्र लोक या इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या आहारी गेले आहेत. "विद्यार्थी आणि समाजातील इतर घटकामध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे" असे अब्दुल कलाम यांचे मत होते. स्वामी विवेकानंद ग्रंथालयातून रोज एक पुस्तक आणून त्याचे वाचन करीत असत. पुस्तकेच माणसाला समृद्ध करतात. राजमाता जिजाऊंनी बाल शिवाजीला पराक्रमाच्या गोष्टी सांगून त्याच्या शौर्याला आकार दिला होता.बाबासाहेब आंबेडकरांना ‘पुस्तक माझा मित्र’ या मंत्राने वाचनातूनच समाजाची विचारधारा बदलून स्वतःच्या कार्याची दिशा गवसली होती. दबलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे असल्यास वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही. बहिणाबाईंच्या कविता लोकांनी लिहून ठेवल्यामुळे वाचनातूनच त्यांचा जीवानुभव समजला.

          वाचनाला वय नसते. पुस्तके आपल्याला अमर्याद ज्ञानाची खोली देतात. जेष्ठ साहित्यिक दासू वैद्य यांच्या ओळी किती सुंदर आहेत पहा..ते म्हणतात, 

“पुस्तकं काही सांगू इच्छितात,
तुमच्या सावलीत रांगू इच्छितात,
पुस्तकात पक्ष्याची चोच बोलते
पुस्तकात हिरवेगार रान हलते”

  शेवटी मी एवढेच म्हणेन, *पुस्तकांचं बोट धरून वाचनाच्या विश्वात प्रवेश केला तर आपल्या जाणिवांचा प्रवास लख्ख झाल्याशिवाय राहणार नाही.*



               *ऋचा पत्की लातूर*
Previous Post

पंचशील आणि अष्टांग मार्ग अंगीकारा – मानवी कल्याणाचा खरा मार्ग : भंते सुमेध नागसेन

Next Post

ज्ञानतीर्थ युवक महोत्सव – २०२५ मध्ये दयानंद कला महाविद्यालयाचा शानदार यशाचा ठसा!

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

ज्ञानतीर्थ युवक महोत्सव – २०२५ मध्ये दयानंद कला महाविद्यालयाचा शानदार यशाचा ठसा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved