• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

परिमंडळातील ११ हजार ३१६ ग्राहकांना ‘अभय’चा लाभ

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
March 26, 2025
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लाभ घेण्यासाठी उरले केवळ पाच दिवस

लातूर, दि.२६ मार्च: कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीजग्राहकांसाठी महावितरणने सुरू केलेल्या अभय योजनेचा लाभ घेत लातूर परिमंडळातील ११ हजार ३१६ वीजग्राहकांनी १६ कोटी ६ लाख रूपयांची थकबाकी भरत पुनर्जोडणी घेतली आहे. अभय योजनेची मुदत ३१ मार्च २०२५ रोजी संपत आहे. उरलेल्या पाच दिवसात पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

लातूर, धाराशिव व बीड जिल्हयांचा समावेश असलेल्या लातूर परिमंडळातील ११ हजार ३१६ कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत झालेल्या वीजग्राहकांनी १६ कोटी ६ लाख रूपयांचा भरणा करत अभय योजनेचा लाभ घेतला आहे. या ग्राहकांना तब्बल ११ कोटी ६ लाख रूपयांची भरघोस सुट मिळालेली आहे.

लातूर जिल्हयातील ५ हजार २३६ वीजग्राहकांनी ३ कोटी ५२ लाख रूपयांची थकबाकी भरत १ कोटी ४९ लाख रूपयांची माफी मिळवली आहे. यामध्ये लातूर विभागाच्या १ हजार ९१ ग्राहकांनी ८७ लाख रूपयांचा भरणा करत ३५ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर निलंगा विभागातील २ हजार २९७ ग्राहकांनी १ कोटी ४५ लाख रूपयांचा भरणा करत ५५ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तसेच उदगीर विभागातील १ हजार ८४८ ग्राहकांनी १ कोटी १९ लाख रूपयांचा भरणा करत ५९ लाख रूपयांच्या माफी मिळाल्याचा समावेश आहे.

धाराशिव जिल्हयातील कायमस्वरूपी वीज खंडीत केलेल्या २ हजार ३१३ वीजग्राहकांनी १ कोटी ५५ लाख रूपयांचा भरणा करत १ कोटी १४ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. यामध्ये तूळजापुर विभागातील ८३७ वीजग्राहकांनी ६५ लाख रूपयांचा भरणा करत ३८ लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर धाराशिव विभागातील १४७६ वीजग्राहकांनी ९० लाख रूपयांचा भरणा करत ७६ लाख रूपयांची सुट मिळवली आहे.

बीड जिल्हयातील ३ हजार ७६७ वीजग्राहकांनी १० कोटी ९९ लाख रूपयांचा भरणा करत ८ कोटी ४३ लाख रूपयांची भरघोस सुट प्राप्त केली आहे. यामध्ये आंबाजोगाई विभागातील १०६८ वीजग्राहकांनी ७ कोटी ७५ लाख रूपयांचा भरणा करत ५ कोटी २० लाख रूपयांची सुट मिळवली आहे. तर बीड विभागातील २ हजार ६९९ वीजग्राहकांनी ३ कोटी २४ लाख रूपयांचा भरणा करत ३ कोटी २४ लाख रूपयांची सुट मिळवली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला किंवा ताबेदारास थकबाकी भरावीच लागते. त्यामुळे वीजबील थकीत असलेल्या ग्राहकांनी पाच दिवसात अभय योजनेचा लाभ घ्यावा. दोनवेळा मुदतवाढ मिळालेल्या या योजनेस पुन्हा मुदतवाढ न देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास १०० टक्के व्याज व विलंब आकार (दंड) माफ होत आहे. मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त सवलत मिळत आहे. यासोबतच सुरुवातीस मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीही सोय आहे. तसेच लाभार्थी ग्राहकांना मागणीनुसार त्या जागेवर नव्याने वीजजोडणी दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ पाचच दिवस शिल्लक असून, थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे.

Previous Post

शासकीय जिल्हा ग्रंथोत्सव-२०२४🌹

Next Post

कु. पौर्णिमा मस्के उत्कृष्ट वाचक तर स्वगुणवाढ परितोषिकांची मानकरी ठरली कु. ब्रह्मकुमारी भोसले

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

कु. पौर्णिमा मस्के उत्कृष्ट वाचक तर स्वगुणवाढ परितोषिकांची मानकरी ठरली कु. ब्रह्मकुमारी भोसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved