• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

नोकऱ्यांचे कंत्राटीकरण तातडीने रद्द करा;बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाकडे कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी* 

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
April 11, 2025
in Blog
0
0
SHARES
182
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर दि.11: “बँकात कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या कंत्राटीकरणाच्या माध्यमातून होण्याऐवजी कायमस्वरूपी पद्धतीने व्हाव्यात” ही मागणी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनन या ए आय बी इ ए शी संलग्न संघटनेने बँक ऑफ महाराष्ट्राच्या देशभरातील सर्व क्षत्रिय प्रबंधकांच्या मार्फत निवेदनाद्वारे बँकेच्या चेअरमन यांचे कडे केलीआहे.

या वर्षाची डॉ आंबेडकर जयंती या संघटनेने कंत्राटीकरण “हटाव – आरक्षण बचाओ” अशी देशव्यापी मोहीम घेऊन साजरी करण्याचे ठरविले आहे. त्या निमित्ताने लातूर च्या बँक ऑफ महाराष्ट्र झोनल मॅनेजर यांना बहुसंख्य कर्मचारी यांच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन सादर केले.

या प्रसंगी बोलताना संघटनेचे नेते कॉ.धनंजय कुलकर्णी म्हणाले की, “महाराष्ट्र बँक मध्ये शिपाई व सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा गेली दहा वर्षे म्हणजे 2014 सालापासून रिकाम्या असताना त्या कायमस्वरूपी भरण्याऐवजी बँकेचे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने कंत्राटीकरणाच्या माध्यमातून त्या जागा भरू पाहत आहे, ज्याला संघटना म्हणून आम्ही सातत्याने विरोध करीत आलो आहोत व व्यवस्थापनाने कंत्राटीकरणाचे हे नवे प्रारूप जर मागे नाही घेतले तर हा लढा आणखी तीव्र करू,” असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. या प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की ,”भारतीय स्वातंत्र्यानंतर या देशातील बँका या काही मोजक्या उद्योगपतींच्या हातात होत्या. सर्वसामान्य लोकांच्या ठेवी स्वीकारून त्यांचा उपयोग स्वतःचे उद्योग मोठे करण्यासाठी ते करीत असत. या बँकांमधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्ट्या, पीएफ, ग्रॅज्युईटी यासारखे कोणतेही लाभ मिळत नव्हते. बँकांमध्ये काम करणाऱ्या या सर्व कष्टकऱ्यांच्या घामाचा त्यांना योग्य मोबदला मिळण्यासाठी या बँकांचे राष्ट्रीयीकरण व्हावे ही मागणी घेऊन ए आय बी ए ने रस्त्यावरची लढाई लढली परिणामतः बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले व कर्मचाऱ्यांना सर्व लाभासहित कायमस्वरूपी नोकरी मिळाली. 

बँकांच्या राष्ट्रीयकरणामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, बहुजनांची मुले अधिकारी, लिपिक, शिपाई म्हणून बँकेत रुजू होऊ लागली. बँकातून होणारी ही भरती सामाजिक न्यायाप्रमाणे व  घटनाकारांनी दिलेल्या आरक्षणाप्रमाणे होत आहे ज्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास या सर्व जातीमधून होतकरू व गुणवंत विद्यार्थी पुढे येऊ लागले व त्यांचा आर्थिक स्तर सुधारू लागला. आणि नेमके हेच आजच्या सरकारचे दुखणे आहे. संघटना मागील अनेक वर्षांपासून बँकांच्या व्यवस्थापनाला भांडत आहे की बँकांमधून लिपिक व सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली सर्व पदे भरावीत. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आज अशा अनेक शाखा आहेत जिथे एक ही क्लार्क नाही किंवा ज्या ठिकाणी दोन ते तीन क्लार्क ची गरज आहे अशा शाखा एका क्लार्क वरती चालविल्या जात आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये शिपाई कर्मचाऱ्यांच्या 1232 जागा रिक्त आहेत तर सफाई कर्मचाऱ्यांच्या साधारणतः 2659 जागा रिक्त आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने बहुजनांची मुले काम करतात परंतु यांना बहुजनांची मुले शिकून बँकांमध्ये अधिकारी लिपिक शिपाई व्हावे असे वाटत नाही म्हणूनच 2014 पासून चतुर्थ श्रेणीतील नोकऱ्या आरक्षणाने कायमस्वरूपी भरण्याऐवजी कंत्राटीकरणाचे नवीन प्रारूप ते आणू पाहत आहेत. भांडवलदार कंत्राटदार व सरकार यांच्या मिलीभगतिनेच कंत्राटीकरणाचे हे नवे प्रारूप पुढे येते आहे ज्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारी सुट्ट्या,ग्रॅज्युएटी, पेन्शन, हॉस्पिटललायझेशन, कामाचे मर्यादित तास यासारख्या मूलभूत मानवी हक्कांना तर मुकावे लागणार आहेत सोबत अतिशय तुटपुंज्या मजुरी वरती त्यांना काम करावे लागणार आहे व कंत्राटदारांची गुलामगिरी त्यांच्या पदरात पडणार आहे. कंत्राटीकरणाने होत असलेली भरती ही कोणत्याही आरक्षणा विना होत असते म्हणजे एक प्रकारे संविधानाने दिलेले आरक्षणच नष्ट करण्यासाठी कंत्राटीकरणाचे नवीन मॉडेल विकसित केले गेले आहे. एकीकडे संविधानाला अतिशय पूजनीय म्हणायचे तर दुसरीकडे संविधानाने दिलेले आरक्षण संपविण्यासाठी कंत्राटीकरणाचे नवीन प्रारूप विकसित करायचे हा एक प्रकारे संविधानाचा,घटनाकारांचा व एकूणच घटनेने दिलेल्या समताधिष्ठित मानवी मूल्यांचा अवमान आहे म्हणूनच बँक कर्मचाऱ्यांची संघटना याचा जोरदार विरोध करते व मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने याच्या विरोधात रस्त्यावरची लढाई लढत आहे. ही लढाई केवळ कंत्राटीकरणापूरती मर्यादित नसून यामध्ये खाजगीकरणाविरुद्धचा लढा सुद्धा समाविष्ट आहे. कारण खाजगीकरणाच्या माध्यमातून सध्याचे सरकार काळाची चाके उलटी फिरू पाहत आहे ज्याचा अंतिमतः परिणाम बहुजनांच्या गुलामगिरी मध्ये होणार आहे हे आपण लक्षात ठेवायला हवे म्हणूनच ही लढाई फक्त बँक कर्मचाऱ्यांची नाही तर समस्त कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची आहे. सर्वसामान्य कष्टकऱ्यांची मुले शिकून सुद्धा आज त्यांच्या हाताला कुठलेही काम नाही. एकीकडे बँकांमधून लाखो पदे रिक्त असताना आर्थिक नफा कमविण्यासाठी व आरक्षण नष्ट करण्यासाठी कायमस्वरूपी भरती ऐवजी कंत्राटीकरण व खाजगीकरण हे सरकार करू पाहत आहे जे सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीला मारक आहे हे आपण ध्यानात घेऊन  आपल्या भावी पिढीतील मुलांसाठीची लढाई असल्याचे मानून बँक कर्मचाऱ्यांच्या लढ्यामध्ये उतरायला हवे “,असे आवाहन ही कॉम्रेड धनंजय कुलकर्णी यांनी केले.

या प्रसंगी बँक कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी कॉ दीपक माने,इतर पदाधिकारी कॉ.रेश्मा भवरे, कॉ.सुधीर मोरे, कॉ.महेश घोडके यांचेसह लातूर शहर आणि परिसरातील बहुसंख्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी हजर होते.

Previous Post

राजकारण नसेल तरी समाजकारण असावं – माजी खा.सुधाकर श्रंगारे साहेब, लातूर जिल्ह्याची मनापासून अपेक्षा!

Next Post

“महामानवांच्या प्रतिमेसमोर केवळ नम्र अभिवादन… स्वतःचा फोटो लावणं म्हणजे श्रद्धेचा अपमान!”

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

"महामानवांच्या प्रतिमेसमोर केवळ नम्र अभिवादन... स्वतःचा फोटो लावणं म्हणजे श्रद्धेचा अपमान!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved