• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

माळरानावर फुललेलं नंदनवन – पण आता प्रश्नचिन्हांसमोर!

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
August 1, 2025
in Blog
0
0
SHARES
144
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

✍🏻 दीपरत्ना निलंगेकर

लातूर जिल्ह्यातील हासेगावच्या माळरानावर उभं राहिलेलं ‘सेवालय’ हे केवळ बालगृह नाही, ते एका ध्येयवेड्या तरुणाच्या आयुष्याचं, त्याच्या स्वप्नाचं, आणि समाजासाठी त्यागलेल्या आयुष्याचं सजीव उदाहरण आहे. प्रा. रवी बापटले या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने वयाची पन्नाशी पूर्ण करताना मागील पंचवीस वर्षे केवळ एच.आय.व्ही. बाधित मुलांच्या संगोपनासाठी खर्च केली.

तेव्हा समाज, कुटुंब आणि नातेसंबंध सगळ्यांनी पाठ फिरवलेल्या या निष्पाप मुलांना निवाराही कोणी द्यायला तयार नव्हते. त्यांच्यासाठी “सेवालय” उभं करणं म्हणजे नुसतं सामाजिक कार्य नव्हे – ती होती एक क्रांती! रवी बापटले यांनी स्वतःचं आयुष्य, वैयक्तिक सुख, कुटुंब या सगळ्यांचा त्याग करून ह्या बालकांनाच आपलं कुटुंब मानलं.

त्यांनी ‘बापटले’ हे आडनावही टाकून फक्त ‘रवी’ असं नाव स्वीकारलं, कारण ते प्रत्येक मुलासाठी केवळ एक पालक, मार्गदर्शक होते – जातीपातीच्या, नावाच्या ओळखीच्या पलिकडचं एक नातं.

तेथील हॅप्पी इंडियन व्हिलेज या संकल्पनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. या परिसरात विवाहयोग्य बाधित मुलांचे विवाह लावून देणे, आणि त्यांचं आरोग्यदृष्ट्या सुरक्षित पुढील पिढी तयार होणं – हे एक विज्ञान आणि संवेदनशीलतेचा अनोखा संगम ठरला.

परंतु… सध्या या नंदनवनावर संकटाचे सावट पसरले आहे.

अलीकडे एका अल्पवयीन मुलीने सेवालयातील राहत्या काळाबद्दल काही गंभीर आरोप केल्यामुळे प्रा. रवी यांना अटक झाली. या आरोपांची सत्यता ठरवण्याचे काम न्यायव्यवस्थेवर सोडून, आपण मात्र या कार्यकर्त्याच्या दोन तपांच्या सेवेचा न्यायपूर्ण, संवेदनशील आणि सामाजिक संदर्भात विचार करायला हवा.

शासनाच्या निरीक्षणात सध्या सेवालयातील जागा “बालगृहासाठी अयोग्य” असल्याचे नोंदवण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी नियमित भेट देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे निरीक्षण, मुलांचे समाधान, शिक्षण व राहणीमानाची चांगली व्यवस्था दाखवत आहेत.

या पार्श्वभूमीवर काही प्रश्न समाजासमोर उभे राहतात:

  • एखाद्या आरोपाच्या आधारे संपूर्ण संस्थेचं मूल्यांकन होणं कितपत योग्य?
  • एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या कार्याला डाग लावणं, केवळ आरोपांवर आधारित असणं, हे किती नैतिक आहे?
  • आणि सगळ्यात महत्त्वाचं – या संस्थेतील निराधार मुलांचं काय?

जर या संस्थेतील बालकांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलं, तर त्यांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा, आणि मानसिक स्थैर्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करेल.

शासनाची जबाबदारी केवळ निरीक्षणपुरती मर्यादित नाही, तर न्याय्य आणि संवेदनशील व्यवस्थापन देखील आवश्यक आहे.

शासनाने एखादा अधिकारी दोन दिवस या परिसरात वास्तव्यास ठेवून थेट अनुभव घ्यावा — मुलांचे अनुभव, शिक्षण व आरोग्याच्या सोयी तपासाव्या, आणि तटस्थतेने व कृतीशीलतेने भूमिका घ्यावी.

एक गोष्ट मात्र नक्की — या नंदनवनात आजही हिरवळ आहे, चैतन्य आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं – मुलांचं हास्य आहे.

त्या हास्याला तडजोडीची सावली लागू देऊ नये, आणि सामाजिक भावनेतून उभं राहिलेलं हे घरटं – न्यायाच्या झगमगाटात विस्कळीत होऊ नये यासाठी आज जागृक समाजाने पुढे येणं आवश्यक आहे.


सामाजिक न्यायाच्या आणि मानवी संवेदनशीलतेच्या निकषावर प्रा. रवी यांच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करावा, आणि या निष्पाप मुलांच्या भवितव्यासाठी योग्य तो मार्ग शासनाने व समाजाने मिळून शोधावा – हाच खरा ‘सेवा’धर्म!


Previous Post

चळवळीचे प्रेरणास्थान अण्णाभाऊ साठे

Next Post

अख्खं सेवालयचं जेल भोगतंय…!!!

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

अख्खं सेवालयचं जेल भोगतंय…!!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

उत्तुंग कलात्मकतेचा स्पर्श — ‘उन्हातलं चांदणं’

November 30, 2025

🔥 संपादकीय 🔥

November 30, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved