• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
दैनिक युतीचक्र
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
No Result
View All Result
दैनिक युतीचक्र
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • महत्त्वाच्या बातम्या
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
  • आमच्याबद्दल
  • E-Paper
Home Blog

अज्ञानामुळेच मानवी जीवनात दुःखाचा प्रवेश होतो..भंते डॉ.यश कश्यपायन महास्थवीर

दैनिक युतीचक्र by दैनिक युतीचक्र
September 1, 2025
in Blog
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर,दि.०१(मिलिंद
कांबळे)

अज्ञान हेच मानवाच्या दुःखाचे मूळ कारण आहे.आणि अज्ञानामुळेच मानवाच्या जीवनात दुःखाचा प्रवेश होतो.
त्यासाठी जीवनातील दुःख समजून घेऊन आपल्याला त्याचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. अज्ञान म्हणजे केवळ माहितीचा अभाव नाही, तर आपल्या जीवनातील गोष्टी आणि वास्तवाकडे दुर्लक्ष करणे होय.असे प्रतिपादन भंते डॉ. यश कश्यपायन महास्थवीर यांनी केले.


ते वैशाली बुद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथे
बुद्ध धम्म वर्षावास पुनीत पर्वाच्या निमित्ताने आयोजित धम्मदेशनेच्या कार्यक्रमात बोलत होते.
तत्पूर्वी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमाना उपासक-उपासिकांच्या वतीने पुष्प पुष्पमाला अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विनोद खटके, सुनील कांबळे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना भंते पुढे म्हणाले कि,
माणसाच्या जीवनात दुःख आहे दुःखाला कारण आहे. त्यावर उपाय आहे दुःखाचा उदयव्यय ही प्रक्रिया अखंड चालू आहे. अज्ञानामुळे दुःख उत्पन्न होते म्हणून या दुःखाला दूर करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे. त्याचे आचरण करून दुःखाला दूर करा आज आणि उद्या भगवान बुद्धाचा विचार जगाला आवश्यक आहे त्यामुळेच बुद्धाला डॉक्टरांचे – डॉक्टर म्हटले आहे.


ते पुढे म्हणाले कि, अज्ञानामुळे मानवी जीवनात दुःख आहे त्याला कारण आहे घराघरात आई -मुलगा मुलगा -वडील गावा – गावात राज्या- राज्यात देशा -देशात कलह आहे. हा कलह आजचा नाही तर भूतकाळात होता आजही आहे.उद्याही राहणार आहे.त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे कि, विश्वात जो पर्यन्त सूर्य, चंद्र आहे. तोपर्यंत मानवी जग जिवंत राहायचे असेल तर बुद्धाच्या विचाराची कास धरावी लागेल अन्यथा हा कलह या मानवी जीवनाचे काय करेल ते सांगता येत नाही. याकरिता वैराची आवश्यकता नसून मंगल मैत्रीची गरज असल्याचेही आपल्या धम्मदेशनेत भंते कश्यपायन यांनी नमूद केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विनोद खटके, सुनील कांबळे यांच्या हस्ते दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सुप्रिया सातपुते समाजशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यांचा बुद्ध पुस्तिका स्मृतीचिन्ह व पुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी भरत कांबळे, सूर्यभान लातूरकर, किशोर कांबळे, कुमार सोनकांबळे, साहित्यिक जी जी कांबळे, आबा गायकवाड, दामू कोरडे, अशोकराव सातपुते, वसंत वाघमारे, उत्तम गायकवाड, राजू कांबळे, असित कांबळे ,शकुंतला नेत्रगावकर ,शीलाताई वाघमारे ,मीना सुरवसे ,अनुराधा कांबळे ,लता गायकवाड ,लता कांबळे ,आशा बानाटे, आशा गायकवाड ,सविता चिकाटे, शारदा वाघमारे, छाया कांबळे इत्यादी उपासक- उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केशव कांबळे यांनी केले शेवटी धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post

मराठवाड्यातील खासदार आमदारांची लवकरचखा. डॉ. काळगे यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथे बैठकमराठवाड्याच्या अनुशेषासाठी दबाव गट तयार करणार

Next Post

पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पानांच्या गणपतीची स्थापना.. माझं घर प्रकल्पाची संकल्पना

दैनिक युतीचक्र

दैनिक युतीचक्र

दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत. त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले. त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे...त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात. नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत... लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे...

Next Post

पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी पानांच्या गणपतीची स्थापना.. माझं घर प्रकल्पाची संकल्पना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest

महिलांना उद्योगी बनवणारा ‘स्वाभिमान’ उपक्रम

March 12, 2025

*प्रत्यूष उद्योग समूह चे प्रथम वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

November 14, 2024
शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात ‘GST राज’! – शिक्षकांचे निवेदने कचऱ्यात, जनता हवालदिल!

April 16, 2025

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाचा खळबळजनक निर्णय – पदोन्नती हा ‘संविधानिक अधिकार’ नाही!

May 5, 2025

लातूरकरांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्यासाठी मैदानात – डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर

1

भटके विमुक्तांचा आधारवड, चळवळीचा भाष्यकार – विलास माने यांचे निधन

1

शिक्षकी पेशा सार्थ ठरविणारे.. नजीउल्ला शेख गुुरुजी

1
अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव, विरोधकांमध्ये खळबळ

0

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025

🌟 ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा — लातूर केंद्रातून ‘दास्ताँ’ प्रथम 🌟

December 4, 2025

🔥 सडेतोड अग्रलेख 🔥

December 1, 2025
दैनिक युतीचक्र

Our mission is to deliver news that matters, with a focus on quality journalism, reliability, and in-depth analysis. Explore the latest headlines, exclusive reports, and expert opinions on a variety of topics that shape today’s world.

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • आरोग्य
  • कोकण
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • संपादकीय
  • साहित्य /कविता

Recent News

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, लातूर“Towards Infinity” प्रदर्शन — विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या अनंत क्षितिजांचा अनोखा प्रवास

December 6, 2025

लातूरमध्ये पोक्सोची थरकाप उडवणारी कारवाई! अल्पवयीन मुलीवर अत्याचार — कॅफेचालकांसह तीन जण अटकेत

December 6, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 Copyright - All right Reserved

No Result
View All Result

© 2024 Copyright - All right Reserved