दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे…त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत… लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे…

Featured Stories

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान

• १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाची उत्कृष्ट कामगिरी लातूर, दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने...

Read more

Worldwide

भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या       नगरसेविकांच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद

लातूर दि३०- महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना पालिकेच्या बजेटचा अभ्यास करून विकास कामाची मागणी पाहिजे असे मत ज्येष्ठ माजी...

Read more

Techno

लातूरच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांचा ‘पोलीस शेतकर्‍यांच्या बांधावर‘ हा राज्याला दिशादर्शक उपक्रम* 

अभय मिरजकर , (9923001824.) कोणतेही काम प्रामाणिकपणे, चांगला हेतू ठेऊन केले तर त्याचे यश निश्चीत असते असे सांगीतले जाते. लातूर...

Read more

दानपत्र या कादंबरीचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

दानपत्र या कादंबरीचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात, अभिनेते कवी श्री किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्या हस्ते आणि...

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनसरवाडा येथे भव्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबिर; समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श

निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीने आयोजित सर्वरोग निदान...

Read more

Politics

Science

Sports

Lifestyle

Entertainment

Latest Post

लातूरच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांचा ‘पोलीस शेतकर्‍यांच्या बांधावर‘ हा राज्याला दिशादर्शक उपक्रम* 

अभय मिरजकर , (9923001824.) कोणतेही काम प्रामाणिकपणे, चांगला हेतू ठेऊन केले तर त्याचे यश निश्चीत असते असे सांगीतले जाते. लातूर...

Read more

दानपत्र या कादंबरीचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

दानपत्र या कादंबरीचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात, अभिनेते कवी श्री किशोर कदम उर्फ सौमित्र यांच्या हस्ते आणि...

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनसरवाडा येथे भव्य सर्वरोग निदान व रक्तदान शिबिर; समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श

निलंगा तालुक्यातील अनसरवाडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या वतीने आयोजित सर्वरोग निदान...

Read more

‘दानपत्र’ कादंबरीचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न

: साहित्य, रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘दानपत्र’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमयी वातावरणात पार...

Read more

लातूरमध्ये अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय; वेतन थांबविल्याने संतापाची लाट

लातूर : जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन अचानक थांबविण्यात आल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना न...

Read more

वैज्ञानिक दृष्टिकोन हरवलातर लोकशाहीला धोका – जयदेव डोळेमाधव बावगे यांच्या नागरी सत्कारात अंधश्रद्धा,माध्यमे आणि समाजावर भाष्य

लातूर, प्रतिनिधी : गेल्या काही वर्षांमध्ये श्रध्दांची, धर्माची, कुप्रथांची, तसेच चुकीच्या परंपरांची पकड घट्ट होत चालली आहे. ती फेकून दिली...

Read more

भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या       नगरसेविकांच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद

लातूर दि३०- महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना पालिकेच्या बजेटचा अभ्यास करून विकास कामाची मागणी पाहिजे असे मत ज्येष्ठ माजी...

Read more

🎭 मानसरंग नाट्य महोत्सव : विचारांची शुद्ध पेरणी, लातूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद

लातूर | प्रतिनिधी “पेराल ते उगवेल” — ही म्हण आजच्या काळात जणू विसरली जात आहे. मनोरंजनाच्या दुनियेत पुष्पासारख्या आक्रमक प्रतिमा...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान

• १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाची उत्कृष्ट कामगिरी लातूर, दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने...

Read more

मानसरंग नाट्य महोत्सवाचा भावस्पर्शी प्रारंभ… रंगमंचावर मनाचा उत्सव…

📰 लातूर | प्रतिनिधीमनाच्या गाभाऱ्यात दडलेले भाव, विचार आणि प्रश्न यांना रंगमंचावर शब्द मिळाले…आणि “मानसरंग” या दोन दिवसीय नाट्यमहोत्सवाचा प्रारंभ...

Read more
Page 1 of 77 1 2 77

Recommended

गोड गळ्याची कडूबाई पंचवीस वर्षांपूर्वी कंधार आणि कर्नाटकातील काही माणसं छत्रपती संभाजी नगर येथे आली होती. त्यांनी चल म्हटले आणि मी त्यांच्यासोबत करमाड परिसरात गेलो. तिथं एका मंदिरात सुरेल आवाजात भजनं गात असलेली एक महिला होती. मी तिथं बराच वेळ घुटमळलो. कुठलीही विचारपूस न करता घरी आलो. मात्र तो आवाज कानात घुमत होता. काळाच्या ओघात मी विसरूनही गेलो.एक दशक उलटून गेले. तंत्रज्ञानाची क्रांती अफाट वेगानं समाजजीवनावर आदळत होती. त्यात अँड्रॉइड मोबाईल आले. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या हातात संपूर्ण जग दिसू लागले. याच समाजमाध्यमातून एक सूर जगाच्या कानाकोपऱ्यात गुंजू लागला, ‘माझ्या भीमानं माय सोन्यानं भरली ओटी.‘ हे कडवं प्रत्येकाच्या जिभेवर घोळू लागलं. तो स्वर म्हणजे दुसरं तिसरं कोणी नव्हतं. त्या होत्या स्वरसम्राज्ञी गोड गळ्याच्या कडूबाई खरात. त्याच कडूबाईंचा संघर्ष अफाट कष्टाचा आहे.कडूबाईंचा जन्म गावकुसाबाहेर आई तान्याबाई आणि वडील तुकाराम कांबळे यांच्या घरी झाला. आवाना ता. भोकरदन जि. जालना येथे तुकाराम कांबळे हे एकतारीवर सांप्रदायिक भजनं गात आपली उपजीविका करत. त्यांच्या म्हातारपणीचं एकमेव बाळ म्हणजे कडूबाईं. निसर्गानं सुरांचं अफलातून दान जिच्या ओटीत भरभरून टाकलं, तर तत्कालीन समाजाच्या रितीने एवढ्या गोड गळ्याच्या गायिकेचं नाव कडूबाई ठेवलं. बालपणीच गाण्याचा रियाज आई वडिलांसोबत कडूबाईंनी सुरू केला. निर्गुण निराकार भजन मंडळ त्यांचे होते. त्यात ते अभंग, गवळणी, पदं, गाणी गात. त्यातून मिळालेल्या मानधनावर ते जगत, पण त्यांचा संघर्ष सुरू होता. तुकाराम कांबळे यांचं तीन माणसांचं कुटुंब कलाकार असल्याने त्यांना जात व्यवस्थेचा जाच नव्हता. मात्र दुसरीकडे याच व्यवस्थेने दमकोंडी केल्यामुळे जगण्यासाठी साधनं उपलब्ध नव्हती. म्हणून त्यांना जगण्यासाठी भटकंती करावी लागत होती. याच काळात कडूबाईंच्या गायनाचा पाया रचला गेला. आई वडिलांनी गायलेली, लाऊडस्पिकरच्या भोंग्यातून ऐकलेली गाणी त्या तोंडपाठ करू लागल्या. ती वेगवेगळी भजनं, गाणी, अभंग, गवळणी गाऊ लागल्या. कडूबाई यांचे लग्न वालसावंगी ता. भोकरदन जि. जालना येथील देवीदास खरात यांच्यासोबत झाले. कडुबाई आईवडिलांना एकुलती एक असल्याने देवीदास खरात तुकाराम कांबळे यांचे घरजावई म्हणून आवाना येथे आले.‌ त्यांचा संसार सुरू झाला. जे मिळेल ती कामे करू लागल्या. त्यातून त्यांचं जगणं सुरू होतं. मात्र त्यांच्या आत असलेली गायकी अस्वस्थ होती. अधूनमधून त्या वडिलांसोबत गायनाचे कार्यक्रम करत. यातच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचा मोठा आधार गेला. कडूबाई रोजंदारीवर काम करत करत संसाराचा गाडा हाकत होत्या. यातच देवीदास खरातही कायमच्या प्रवासाला निघून गेले. यावेळी कडुबाईंची मुलगी सहा महिन्यांची होती. घरी लहान लहान मुले, म्हातारी आई आणि स्वतः त्या. असा कुटुंबाचा भार कडूबाई यांच्यावर पडला; पण त्या डगमगल्या नाहीत. खंबीरपणे उभे राहिल्या. त्या सांगतात, ‘या काळात खूप परवड झाली. कार्यक्रम रात्री असत. त्यामुळे मुलांना घेऊन रात्री कार्यक्रम करणं जिकिरीचं होतं. म्हणून कार्यक्रम करणं बंद करून रोजंदारी सुरू केली. मात्र यात घरखर्च भागत नव्हता. यासाठी त्यांनी वडिलांची एकतारी उचलली. त्या एकतारीला घेऊन घरोघरी जाऊन गाणे गात होते. त्यातून घरखर्च भागत होता.’कडुबाई ज्या कलापथकात गात होत्या त्याच पथकातील पेटी मास्तर तेजराव सपकाळ होते. त्यांनी चिकलठाणा येथे राहत असलेल्या प्रसिद्ध लोककलावंत मीराबाई उमप यांची ओळख करून दिली. मीराबाई यांनी त्यांना सोबत घेऊन काही कार्यक्रम केले. मीराबाई उमप यांच्यासोबत त्यांनी चार पाच वर्षे गायन केले. त्या चिकलठाणा परिसरात भाड्याने राहू लागल्या. मात्र प्रत्येक कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनावर घरखर्च भागत नव्हता. मग त्यांनी एकतारीला सोबत घेत वेगवेगळ्या नगरात गात फिरू लागल्या. लोक काही प्रमाणात मदत करू लागली. लहाणपणापासून ऐकलेली गाणी तोंडपाठ करत तेच गाणे नव्या सूरात त्या गाऊ लागल्या. तो गोड आवाज सहजपणे समाजात सुगंध पेरू लागला. एक दिवस ‘आपुन खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं’ हे कडुबाईंच्या सुरातलं गाणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालं. तिथूनच कडुबाईची फाटकी झोळी दूर फेकली गेली आणि ‘माझ्या भीमानं माय सोन्यानं भरली ओटी’ या गाण्याप्रमाणेच कडुबाईंची ओटी सोन्यानंच भरून गेली. इथूनच कडुबाईंचा गोड गळा सातासमुद्रापार गेला. त्यामुळे समाज माध्यमांसह टी. व्ही. चॅनल आणि प्रिंट मीडियावर त्या झळकल्या. मग कला, साहित्य आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रातील सर्वांचं लक्ष वेधल्या गेलं.‌ त्यांना भेटायला अनेक मान्यवर आली. कधीकाळी घरभाडे द्यायला पाचशे रुपये जवळ नव्हते त्यांना आता मदतीचा आधार मिळाला. जगण्याची परवड काही प्रमाणात थांबली.‌ त्या नामवंत कलाकारांच्या स्टेजवर गाऊ लागल्या. एकाच व्यक्तीच्या जगण्यात दोन टोके कशी तयार झाली, याचा प्रत्यक्ष साक्षात्कार कडुबाईंना झाला. आतापर्यंत मंदिरात भजनं, गवळणी गायल्या, पण त्यांना इतका मान सन्मान मिळाला नव्हता. जगायला समाधानकारक मिळत नव्हतं. मात्र जिभेवर ‘जयभीम’ येताच आयुष्याचं सोनं व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे कडूबाई नम्रपणे म्हणतात, ‘मी बाबासाहेबांचं प्रबोधनाचं काम गाण्यातून केलं नसते तर जगू शकले नसते. बाबासाहेबांचे विचार अंगी नसते तर मी मेलो असते, माझी लेकरं मेली असती. बाबासाहेबांच्या विचारांनीच आम्हाला जगवले.’ हे समाजवास्तव आहे की, बाबासाहेबांच्या विचारावर जगणारा माणूस उपाशी मरत नाही. त्या माणसाच्या सुख – दु:खाला आधार होणारी अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत.कडुबाईंचा जीवन संघर्ष वेगवेगळ्या माध्यमातून समोर आला. त्यांना माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाभाऊ पटोले यांनी घर दिले. त्यामुळे कडूबाईंच्या जगण्यात स्थिरता आली. गावोगावी भीम गीतांचे कार्यक्रम होऊ लागली. आज जगात जिथे कुठे बाबासाहेबांचे अनुयायी राहत आहेत, अशा देशात कडूबाईंचा आवाज पोहोचला आहे. त्यामुळे त्यांना मिळालेली लोकप्रियता अफाट आहे. कडूबाईंना असं वाटतं की, ‘भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर समाजातील जातीव्यवस्था मोडीत काढण्याचे कार्य केले. मात्र आपण एकमेकांच्या जाती विचारत आहोत. मला लोकांनी जात विचारली की वाईट वाटते.’ एका निरक्षर भाबड्या लोककलावंताचं मन किती उदात्त हेतू घेऊन काम करत आहे, याची प्रचिती येते. यातून उच्च डिग्री घेऊन जातीच्या कोंडवाड्यात स्वतःला कोंडून घेणारे आम्ही सारे जातीवादी आहोत, हे ठळकपणे अधोरेखित होते. कडूबाईंची उदात भावना, अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जाणारे आहे.कडूबाई खरात यांच्या आवाजातील अनेक गाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या मोबाईलमध्ये स्टोअर आहेत. तीच गाणी लोकप्रबोधनाचं काम करत आहेत. तोच सूर प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करत प्रबोधनाच्या वाटेवरून हलू न देता ताल धरायला लावत आहे.‌ हा ताल सूर एका दिशेने निघाले तर निश्चितच समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते.‌ कडुबाईंची मुलं बुलडाणा जिल्ह्यातील एका वसतिगृहात शिक्षण घेत होती. आता ती मोठी झाली आहेत. तेही कडुबाईंच्या संचात सोबत करत आहेत.‘केवळ बाबासाहेब आणि बाबासाहेबांमुळेच आमच्या जीवनाचा उद्धार झाला.’ असं सांगून आपला आवाज, आपली कला त्या भीम, बुद्ध गीतांत ओतून नवा जोश पेरण्याचे काम करत आहेत. प्रत्येक गाणं संपल्यावर त्या ‘जयभीम’ करायला विसरत नाहीत. अशा कलावंतांमुळेच समाज घडत असते, बदलत असते. म्हणून या गोड गळ्याच्या गायिकेचं गाणं अधिक अधिक सुरेल व्हावं, हीच नितळ भावना.वैजनाथ वाघमारेछत्रपती संभाजी नगर,मो – 8637785963/7758941621

Most Popular