दिपरत्न निलंगेकर हे लातूर जिल्ह्यातील एक सक्रिय पत्रकार असून त्यांनी विविध सामाजिक, राजकीय आणि क्रीडा विषयांवर वार्तांकन केले आहे . त्यांचे रिपोर्ट्स आणि बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असतात. ते डीडी सह्याद्रीसारख्या माध्यमांमध्ये गत 25 वर्षा पासून कार्यात आहेत.

त्यांनी विलासराव देशमुख यांच्या कार्यावर बनवलेला जाणता राजा हा माहितीपट विशेष गाजला.तर मागील काळात राज्याला सतावणाऱ्या चिकन गुण्या ची भीती पळाली हा प्रबोधनपट या विषयावर आरोग्याबाबत जाणीवजागृती करणारा पहिला माहितीपट ठरला याचे डॉ नरेंद्र दाभोळकर यांनी कौतुक केले.

त्यांच्या पत्रकारितेचा मुख्य फोकस लातूर आणि परिसरातील घडामोडींवर आहे. त्यांनी स्थानिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि राजकीय घडामोडींवर सखोल रिपोर्टिंग सोबतच समाज हिताच्या बातम्या आंदोलन यात ते सक्रीय असतात तसेच गत 13 वर्षापासून लातूर येथे पर्यावरण एकांकिका स्पर्धेचे ते आयोजन करतात त्याचे पर्यावरण जागर हा एकांकी बालनाट्याचा संग्रह तर जिल्हा परिषद जिंदाबाद या दोन अंकी नाटकाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.सध्या हे नाटक खूप गाजत आहे…त्यांच्या पत्रकारितेच्या योगदानामुळे ते लातूर जिल्ह्यात एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात.

नवीन समाज माध्यमात न्यूज पोर्टल हे लोकशाहीचे संरक्षण करणारे स्वतंत्र आयुध म्हणून प्रत्येक माणसाच्या हातात आले आहे याचा सकारात्मक उपयोग करून विकासात्मक गोष्टी सोबतच लोकशाहीला मारक बाबींपेक्षा सकारात्मक संविधान रक्षक आणि देशात समता प्रस्थापित करण्याचा बुलंद आवाज बनण्यासाठी हे युतीचक्र आम्ही कारनी लावत आहोत… लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रस्थापित पैशाच्या ढीगात बुजवून यातून कष्टकरी पत्रकारांना बिगारी बनवू पाहणाऱ्या या व्यवस्थेच्या विरोधातील हा एक लढा आहे…

Featured Stories

स्वीकृत सदस्य: तज्ज्ञ की राजकीय समायोजन? — कायद्याच्या हेतूची उघड पायमल्ली

महानगरपालिकांच्या कामकाजात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, शहर विकास अधिक तांत्रिक आणि व्यावसायिक पद्धतीने व्हावा, तसेच राजकारणाबाहेरील अनुभवी व्यक्तींना निर्णय प्रक्रियेत स्थान...

Read more

Worldwide

“इतरांना फायर ऑडिटचा आदेश… पण स्वतःच्या इमारतीच धोक्यात! लातूर महापालिकेचा निष्काळजीपणाचा कळस”

मुदतबाह्य आग प्रतिबंधक सिलेंडर, फायर ऑडिटचा अभाव, आणि जिल्हा नियोजन समितीकडे धुळखात पडलेला प्रस्ताव – नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न…!!! लातूर...

Read more

Techno

सिरीजमध्ये स्मार्ट मीटर बसवून वीजग्राहकांचे समाधान

चाकूरच्या १६० ग्राहकांनी स्मार्ट मीटर घेतले बसवून चाकूर (प्रतिनिधी): दि. २० जुलै : स्मार्ट मीटर बसवण्यबाबत वीजग्राहकांच्या मनात असलेल्या विविध...

Read more

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

उपाध्यक्षपदी दयानंद सूर्यवंशी यांची निवड लातूर | प्रतिनिधी :लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात...

Read more

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

अभय मिरजकर, लातूर शासनाच्यावतीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असते. त्याचा योग्य उपयोग करुन घेतला तर निश्चीतपणे प्रगती साधता येते....

Read more

Politics

Science

Sports

Lifestyle

Entertainment

Latest Post

सिरीजमध्ये स्मार्ट मीटर बसवून वीजग्राहकांचे समाधान

चाकूरच्या १६० ग्राहकांनी स्मार्ट मीटर घेतले बसवून चाकूर (प्रतिनिधी): दि. २० जुलै : स्मार्ट मीटर बसवण्यबाबत वीजग्राहकांच्या मनात असलेल्या विविध...

Read more

लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर बिनविरोध

उपाध्यक्षपदी दयानंद सूर्यवंशी यांची निवड लातूर | प्रतिनिधी :लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी उषाताई संभाजीराव पाटील तळेगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात...

Read more

ग्रामिण भागातील यशस्वी उद्योजिका

अभय मिरजकर, लातूर शासनाच्यावतीने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असते. त्याचा योग्य उपयोग करुन घेतला तर निश्चीतपणे प्रगती साधता येते....

Read more

बुद्ध गार्डन येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

समता, स्वावलंबन आणि करुणेचा संदेश; विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली महिलांची मेजवानी लातूर : बुद्ध गया महिला मंडळाच्या वतीने...

Read more

नारी हीच नारायणी : दर्जी बोरगाव येथे महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहात

लातूर | दि. १३ मार्च २०२६ ग्रामीण महिलांचा सर्वांगीण विकास, कौशल्यवृद्धी आणि सूक्ष्म उद्योजकतेतून आर्थिक सक्षमीकरण या उद्देशाने मौजे दर्जी...

Read more

लातूरच्या वाहतूक कोंडीवर निर्णायक कारवाईची चाहूल; प्रशासनाचा ‘अॅक्शन मोड’

लातूर | प्रतिनिधी :लातूर शहरातील दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिकांचा जीव अक्षरशः हैराण झाला असताना आता प्रशासनाने...

Read more

“इतरांना फायर ऑडिटचा आदेश… पण स्वतःच्या इमारतीच धोक्यात! लातूर महापालिकेचा निष्काळजीपणाचा कळस”

मुदतबाह्य आग प्रतिबंधक सिलेंडर, फायर ऑडिटचा अभाव, आणि जिल्हा नियोजन समितीकडे धुळखात पडलेला प्रस्ताव – नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न…!!! लातूर...

Read more

झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या प्रा. तानाजी भोसले यांना ‘नॅशनल टीचर्स पुरस्कार’

लातूर : शिक्षण हीच समाजपरिवर्तनाची खरी शक्ती आहे, या विचाराने झोपडपट्टी व मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने...

Read more

स्वीकृत सदस्य: तज्ज्ञ की राजकीय समायोजन? — कायद्याच्या हेतूची उघड पायमल्ली

महानगरपालिकांच्या कामकाजात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, शहर विकास अधिक तांत्रिक आणि व्यावसायिक पद्धतीने व्हावा, तसेच राजकारणाबाहेरील अनुभवी व्यक्तींना निर्णय प्रक्रियेत स्थान...

Read more

विश्व हिंदी परिषद दिल्ली प्रांताच्या संरक्षकपदी डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांची नियुक्ती

दिल्ली (विशेष प्रतिनिधी):भारतीय भाषांचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत असलेल्या विश्व हिंदी परिषद या प्रतिष्ठित संस्थेने लातूरचे लोकप्रिय माजी...

Read more
Page 1 of 73 1 2 73

Recommended

महाबँक व्यवस्थापन आजच्या संपातून सुद्धा आडमुठेच राहिले तर आंदोलन उग्र करून बेमुदत संप करावा लागेल.………….. कॉ. धनंजय कुलकर्णी.लातूर दिनांक 20: “मागील तीन ते चार वर्षापासून सातत्याने निवेदने, धरणे आंदोलने, निदर्शने तसेच अनेक वेळा संप करून सुद्धा आवश्यक तितक्या प्रमाणात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सर्व संवर्गात नोकर भरती होत नाही. बँक ऑफ महाराष्ट्र चे वरिष्ठ व्यवस्थापन अहंकारयुक्त दर्पाने आंधळे, मुके आणि बहिरे झाले आहे. यांना बँकेच्या उच्च परंपरा,बँकेचे मालक असलेली जनता आणि ग्राहकांचे होणारे हाल, अपुऱ्या कर्मचारी अधिकारी वर्गामुळे त्यांच्या वरील तणाव याकडे मुजोरपने दुर्लक्ष देवून आपल्याच मस्तीत वागत आहे. त्यामुळे या पुढील काळात महाराष्ट्र बँकेतील संघटनेस बेमुदत संप सुद्धा करावा लागला तर त्यास जबाबदार बँकेचे चेअरमन आणि वरिष्ठ व्यवस्थापन जबाबदार असेल,” असा इशारा महाबँक कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिला.आज या बँकेत एक दिवसाचा इशारा संप लातूर शहरात कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून पूर्ण यशस्वी केला. त्यावेळी निदर्शक बँक कर्मचाऱ्यापुढे बोलताना पुढे ते म्हणाले की,”अपुऱ्या कर्मचारी अधिकारी संख्येचा विपरीत तात्काळ परिणाम ग्राहक सेवे वरती होताना दिसून येतो आहे. ग्राहकांना अनेक वेळ ताटकळत रांगेत उभारावे लागत आहे. बँक गेली अनेक वर्षे प्रचंड नफा कमावून उत्कृष्ट कामगिरी करीत आहे, मग या नफ्याच्या बदल्यात ज्या ग्राहकांच्या जीवावर हा नफा कमावला जातो, त्या ग्राहकांना निकृष्ट सेवा देण्याचे दुष्ट धोरण, शोषण करणारे धोरण बँक व्यवस्थापनाने अवलंबीने, हा ग्राहकांचा अवमान आणि कृतघ्नपणा आहे. त्यामुळे उत्कृष्ट सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ग्राहक सेवेचे बारा वाजलेले आहेत. त्यामुळेच “ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र फेडरेशन” या ए आय बी ई ए शी संलग्न असलेल्या संघटनेने बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकर भरती या प्रमुख मागणी साठी 20 मार्च 2025 रोजी संपाची हाक दिली असल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या आजारपणासाठी,प्रमुख सांसारीक व आवश्यक गरजांसाठी रजा मिळत नाहीत. अनेक शाखा मध्ये शिपाई नाहीत.त्यामुळे तेथील शिपायांची कामे कंत्राटी पद्धतीने करून घेतली जातात, जे ग्राहकांच्या ठेवीदारांना धोकादायक आहे.मागील दहा वर्षात अनेक नवीन शाखा उघडल्या गेल्या व बँकेचा व्यवसाय ही अनेक पटीने वाढलेला आहे परंतु कर्मचाऱ्यांची संख्या मात्र कमी झाल्याचे दिसून येते आहे.ऑल इंडिया फेडरेशनने तात्काळ नोकर भरतीची मागणी केलेली आहे त्यासाठी आजचा संप अटळ बनल्याचेही” कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

Most Popular